आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या - आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेची प्रशासनाकडे मागणी.

 पनवेल / दिव्या पाटील -  भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो . भारतातील अनेक जण शेतीवर अवलंबून राहतात. शेतकरी राजा मूळे सर्वांना अन्न मिळत हे प्रत्येकाला माहीत असून सुद्धा शेतकऱ्यांना योग्य तो फायदा होत नाही.योग्य पीक मिळावं या साठी  पाण्याची गरज तर कधी सकस माती मिळण्यासाठी वातावरणाचे समतोल हे सर्व शेतीसाठी महत्त्वाचे असते पण जर वातावरणच साथ देत नसेल तर करायचे काय !  

ह्या वर्षी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. अतिवृष्टी झाल्या मुळे पिकांचे नुकसान झाले आहे .पनवेल - उरण तालुक्यात सुदधा पावसामुळे शेतीच्या पिकाचे नुकसान झाले असून , शेतकऱ्यांच्या कष्ट या वेळी वाया गेलेत , त्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने खेचून नेला आहे. म्हणून  येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा , शेतीची  नुकसानभरपाई व्हावी म्हणून  योग्य तो पंचनामा व्हावा यासाठी  आगरी - कोळी - कराडी संघर्ष संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ  , उपाध्यक्ष भारत भोपी व पनवेल तालुका विभाग अध्यक्ष विवेक भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली दि . २१ ऑक्टोबर रोजी  रायगड जिल्हा अधिकारी , पनवेल प्रांतअधिकारी , पनवेल व उरण तहसीलदार यांना   निवेदन देण्यात आले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...