आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

वध हैवानी वृत्तीचा

नवरात्रौत्सव निमित्त आदर्श वार्ताहर च्या वाचकांसाठी विशेष लेख.... 




।। तू ग दुर्गा तु भवानी संसाराची तूच जननी ।।

         या ओळी फक्त आई भवानीला च न्हवे तर सबंध स्त्रीवर्गाला दर्शवून जातात . समस्त मानव जातीचा जन्म हा स्त्री च्या उदरातून झाला आह, ती सर्वांची करता - करविता आहे . याच भान सर्वांनी ठेवा. आई , मुलगी , नात , आजी अश्या अनेक रुपात ती आपल्याला घराघरात दिसते . एवढेच न्हवे तर सभोवतालचे वातावरण , कुटुंब, व्यवसाय , शिक्षण या प्रत्येक बाबतीत आपली कामगिरी ती चोखपणे पार पाडते .

      प्रगतीच्या बाबतीत स्त्रिया अग्रेसर आहेत . नोकरी करत असताना आपल्या कुटुंबाची काळजी सुद्धा जी योग्य रीतीने घेते ती आहे ' स्त्रीशक्ती ' !!!  सध्याच्या कोरोना महामारीत सुद्धा महिला डॉक्टर , नर्स , सफाई कामगार , शिक्षिका अश्या अनेक रुपात ती सर्वांची सेवा करीत आहे. या स्त्रीशक्ती ला सलाम ! , एवढेच नव्हे तर शाळा , व्यवसाय बंद असल्याने कित्येकांना घरीच राहावे लागत आहे , त्या मुळे कोणतेही काम त्यांना नाही पण प्रत्येक घरात असलेलं मौल्यवान रत्न ते म्हणजे "आई " तीच काम घरात सुद्धा चालूच असते , " जर कोणी विचारले की या कामाचा कंटाळा येत नाही का ? तर ती हसत म्हणते , घरातील काम करण्यात कंटाळा नाही तर आनंद असतो ". आपल्याला पाल्याला नऊ महिने आपल्या उदरात वाढवत असतांना त्यांना घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची "संस्कार" नावाची गोष्ट ती आपल्या मुलांना देते . आपल्या संस्कारांच्या गाभाऱ्यातुन आपल्या पाल्याला घडवण्याचे काम एक स्त्री च करू शकते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका स्त्रीचा च हात असतो. स्त्री हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे जे कोणीही सहजासहजी समजू शकत नाही , पण जो समजेल तो आयुष्यात खूप पुढे जाईल. शिक्षणाद्वारे गगन भरारी घेऊन पुढे जायची जिद्द सुद्धा तिच्यत असते . शिक्षणाद्वारे आपल्या कुटुंबाचे , देशाचे नाव मोठं करण्याचं स्वप्न ती फक्त पाहत नाही तर ते सत्यात सुद्धा उतरवते . 

पण हल्ली याच स्त्रीवर्गाला कित्येक संकटापासून सामोरं जावं लागत आहे. विनाशकारी बुद्धीच्या हैवनांनी सगळीकडे अन्याय माजवला आहे . आणि याच विकतृ वृत्तीच्या लोकांमुळे तिला शांताता पत्करायला लागत आहे . मग याची अनेक कारणं आहेत , त्यातील महत्वाचं कारण म्हणजे " एक स्त्रीच स्त्रीला समजून घेण्यात कुठे तरी मागे पडतेय " , काही ही मदत लागली की पुरुष च आपल्याला मदत करू शकतो असे मनात ठरलेले च असते .

     अरे ! अश्या वेळी आठवा कालिका मातेची महती , जेव्हा दृष्ट महिषासुराने सगळीकडे हाहाकार माजवला होता तेव्हा सारे देव - देवता शांत झाले होते . त्या वेळी कालिकामातेने  आपल्या शक्तीने त्या हैवणाचा वध केला व पुन्हा सर्वत्र शांती पसरवली. एवढी धीट आणि निर्भय स्त्री शक्ती आज शांत झालेय का ?? , मग जरा विचार करा आपण अश्याच शांत राहिलो तर आपल्या अडचणी दूर होतील असे वाटत असेल तर हे चुकीचं आहे . हा विचार आता सोडून द्या गृहलक्ष्मी सोबतच आता रणचंडिकेच रूप सुद्धा दाखवून द्या , आणि या परिस्थितवर मात करा . आणि हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा , स्त्रीने शांत न राहता आपला लढा लढायला सुरुवात केली तरच हे शक्य होईल ." या हैवानी वृत्तीचा वध करण्याची वेळ आता आली आहे   म्हणून आता विचार करत बसण्यापेक्षा आपल्या कृतीतून दाखवून द्या की स्त्रीशक्ती महान आहे , होती आणि कायम राहील " .






- दिव्या प्रमोद पाटील , घणसोली नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...