मुलुंड /शेखर भोसले - मुलुंड पश्चिमच्या ऐसीसी रोड वरील अशोकनगर येथील अलिबहादूर चाल जवळील ३ ते ४ स्ट्रीट लाईटचे पोल गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने रस्त्यावर अंधार पडला असून परिसरात येणाऱ्या - जाणाऱया गाड्यां दिसत नाही आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणचे कर्मचाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून विद्युत पोल दुरुस्तीसाठी काहीच हालचाल होताना दिसत नाही आहे.
याबाबत अधिक माहिती देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) मुलुंड तालुका सचिव उमेश खरात यांनी सांगितले की महावितरणच्या अधिकाऱयांना येथील विद्युत पोल बंद असल्याची तक्रार करण्यात आली. परंतु अद्यापही काहीच कारवाई करण्यात आली नाही आहे. रस्त्यावरून सुसाट वाहणाऱ्या वाहनांना रस्त्यावरील अंधारात पादचारी व दुकानात खरेदीसाठी जाणारी नागरिक, लहान मुले दिसत नाही आहेत त्यामुळे मागील आठवड्यात दोन वेळा येथील रहिवाशांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती सुदैवाने ते थोडक्यात वाचले. परंतु लवकरच येथील विद्युत पोल दुरुस्त केले नाही तर भविष्यात अपघात होवून मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे लवकरात लवकर सर्व विद्युत पोल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा