आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ जुलै, २०२०

आजीबाईंच्या बटव्यातील कलुप्ती....


जीवनात एकमेकांशी सुसंवाद साधणे खूपच आवश्यक असते.  कारण संवादामुळेच आपण विचारांची , अनेक गोष्टींची माहिती व देवाण घेवाण मिळवू शकतो. त्यामुळे काही अपरिचित बाबींवर तोडगाही निघू शकतो.  त्यासाठी बोलका स्वभाव व काही गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता व आवड हवी तरच शक्य असते. मी मुंबईची असल्याने तेथील दमट व उष्ण हवामान होते. लग्न झाल्यावर नाशिकला ( २५ वर्षा पूर्वी ) आले. नाशिकचे हवामान त्यावेळी अतिशय थंड होते. आधीच दमट व उष्ण हवामानातून आल्याने हे शीत हवामान व वातावरण माझ्या आरोग्यास हानीकारकच ठरत होते.  त्यामुळे मला सर्दीचा  त्रास सुरू झाला.  घरगुती काढा घेऊन तात्पुरते बरं वाटत असे. पण थंडीच्या दिवसांत तर माझी प्रकृती बिघडत असे. माझ्या नाजूक शरिराला हे हवामान खूपच बाधत होते. हळूहळू सर्दी चा त्रास खुपच वाढत गेला. मग घरगुती काढा व्यर्थ ठरत असल्याने मी डॉक्टरांकडून औषधे घेतली. त्या औषधांनी पण तात्पुरतेच बरं वाटतं होते. पुन्हा जैसे थै .. तो सर्दीचा त्रास सुरूच. हिवाळ्यात व पावसाळ्यात नाक गळणं थांबत नसे. त्याचबरोबर शिंकांचा त्रास देखील होत असे. नाक पुर्ण लाल होईपर्यंत त्रास सहन करावा लागत असे. मी या सततच्या सर्दीला खूपच कंटाळी होती. गार पाण्याने व बाहेरील थंड हवेने माझा त्रास वाढतच गेला. नंतर तर मला सायनसचा त्रास सुरू झाला.  धुळ , थंड पदार्थांचे सेवन , हवेतील गारवा , परफ्यूम,  सुवासिक अत्तर यांपासून त्रास होत राहिला. बरेच  आयुर्वेदिक औषधे व उपचार केलेत. पण पाहिजे तसा आराम नाही मिळाला.  एकदा सहज भेटण्यासाठी माझ्या मैत्रिणीकडे गेले. बरयाच दिवसांनी भेटल्याचा आनंद  व मनसोक्त गप्पा झाल्या.  समोर एका खाटेवर एक वयोवृद्ध आजीबाई कापसाच्या वाती करत बसल्या होत्या.  माझा बोलका स्वभाव व वृद्धांशी बोलण्याची आवड असल्यामुळे मी त्यांच्या जवळ जाऊन बसली. कोण,कुठुन आली,कोणाकडे आली ? असे आजींनी चौकशी केली.  आजूबाजूच्या बायका मधूनच येवून  आजींना  काही आजारांवर तोडगा मागताना पाहिले. कोणाला चटका बसला तर आजी चुना लावायला सांगत. कोणाच्या पायांत काटा रूतल्याने त्यावर आजी गुळाचा चटका द्यायला सांगत. पाय सुजल्यवर आजी आंबेहळद गरम करून लावायला सांगत होत्या. थोडक्यात,  प्रत्येक गोष्टींवर आजींकडे  कलुपती होत्या.  आजीबाई आणि बटवा हे समीकरण खूपच मिळते जुळते आहे.  मग मी पण न राहून सतत होणाऱ्या सर्दी वर पर्याय सुचवायला लावला. त्यावर आजींनी लगेच एक साधा सोपा व घरगुती उपाय सांगितला.  एक मोठा ग्लास पाणी गरम करत ठेवायचा. तयात मिठाचे खडे घालून पाणी उकळत ठेवावे.  पाणी एक कपभर होईपर्यंत उकळून घ्यावे.  थंड झाल्यावर एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे. मग हे पाणी डराॅपर च्या साहाय्याने दिवसातुन तिन वेळा तिन थेंब घालावे. एक महिना करून बघ मग फरक पडेल असे आजी स्मितहास्य करून बोलल्या.  मी विचार केला , करून बघायला काय हरकत आहे.  मी घरी आल्यावर तसेच करून पाहिले. एका महिन्यात मला खरचं फरक पडला. आश्चर्य म्हणजे माझी सर्दी व शिंका खूपच कमी झाल्या.  मला खूप आनंद झाला.  मैत्रिणीला फोन करून आजींना धन्यवाद द्यायला सांगितले.  खरचं जुन्या लोकांकडे किती सरळ,  सोपा उपचार असतो. कोणतीही समस्या आरोग्य विषयक असली तर चुटकी सरशी त्यावर रामबाण औषध व उपाय असतो. 

- सौ. स्नेहा मुकुंद शिंपी 

  नाशिक -महाराष्ट्र 
                                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...