पावसाळा सुरू झाला की मलेरिया, डेंग्यु, कॉलरा सारखे आदि अनेक साथरोग डोक वर काढतात हा नेहमीचाच अनुभव .
परंतु यंदा या साथीमध्ये घट झाल्याचे वाचनात आले. किंवा प्रमाण तुरळक असल्याचे जाणवते अर्थात कोरोनाच्या धसक्याने म्हणा लहानापासून थोरापर्यंत नागरिक जाणीवपूर्वक घेत असलेली प्रभाग, विभाग, आवार, परिसर येथील सार्वजनिक स्वच्छता, बाहेरून आल्यानंतर शरीर स्वछ करण्याची लागलेली सवय, स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्य विषयक सतर्कता, रोगप्रतिकार शक्तीच्या औषदांचा सदुपयोग, आणि मुख्य म्हणजे घरचे जेवणाला अधिकाधिक दिली गेलेली पसंती, विनाकारण भटकत न राहण्याची केलेली सवय, प्रदूषण होणार नाही याची घेतलेली काळजी या आणि अशा शिस्तबद्ध जीवन शैली माणूस अंगिकारू लागलाय किंवा आत्मसात करतोय त्याचाच परिणाम म्हणजे साथीच्या रोगात दिसून आलेली घट होय. करोनाने शिस्तबद्ध जीवन शैली आम्हास शिकविली असे म्हटल्यास ते चुकीचे होईलच असे नाही. करोना गेल्या नंतर हीच जीवन शैली कायम ठेवणे आपल्याच हातात आहे निरोगी, आरोग्यदाई जीवनासाठी.
-विश्वनाथ पंडित, ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा