मुंबई -(लक्ष्मण राजे )
"मानव सेवा हीच ईश्वर सेवा" या उक्तीप्रमाणे अभिनेत्री नम्रता गायकवाडने मराठी चित्रसृष्टीतील सगळ्या कलावंत-तंत्रज्ञ यांची ह्या लॉकडॉऊनच्या काळात थोड्या फार प्रमाणात झालेली गैरसोय दूर व्हावी म्हणून,कलाकार (सिनिअर/ज्युनिअर)लेखक/दिग्दर्शक (सह दिग्दर्शक)/कॅमेरामन (असिस्टंट)/संकलक/कला दिग्दर्शक(सहाय्यक)/नृत्य दिग्दर्शक (सहाय्यक)/मेकअप मन(सहाय्यक)/हेअर ड्रेसर/स्पॉट बॉय आणि इतर या अनुषंगाने येणारे सगळेच कलाकार/तंत्रज्ञ यांना अन्नधान्याचे कीट वाटप केले . सगळ्या जनतेला आज मदतीची आवश्यकता आहे.पण ज्या कलाक्षेत्राने मला भरभरून दिले,ज्या कलाकार/तंत्रज्ञाने प्रत्येक कलाकृती उत्कृष्ट दर्जाची व्हावी म्हणून प्रयत्न केले,त्यांचा आर्थिक दर्जा सध्याच्या लॉकडॉऊनचा काळात खालावला गेला आहे.
रेड झोन/कॉरेन्टाईन ह्या मुळे सगळं बंद असल्यामुळे घरात अन्नधान्याचा तुटवडा भासू लागलाय.ही त्यांची अडचण ओळखून मी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हे सामाजिक मदत कार्य करते आहे असं मनोगत तिने व्यक्त केले .
अभिनेत्री नम्रता गायकवाड स्वराज्य, वंशवेल, कॅम्पस कट्टा, झरी, विजय असो, बेधडक अशा अनेक दर्जेदार चित्रपटातून चमकली आहे . पण सध्या पूर्णवेळ गरजूंना अन्नधान्य कीटची मदत वाटप करण्यासाठी नम्रता , कार्यकारी निर्माते राजेंद्र सावंत आणि टीम यांच्या सहकार्याने अहोरात्र झटत आहे . तिने सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला आहे . अभिनेत्री नम्रताने केवळ मानवसेवा करण्याच्या भावनेतून मदत वाटप हे व्रत अंगिकारले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा