आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३१ मे, २०२०

टोळधाडीचे नवे संकट

संकट कधीच एकटे येत नाही असे म्हणतात त्याचा प्रत्यय आता भारताला  येत आहे. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीत असलेल्या भारतासमोर आता टोळधाडीचे नवे संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तान मार्गे भारतात शिरकाव करणाऱ्या या टोळधाडरुपी किड्यांच्या समूहाने राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश मधील  हजारो एकर शेती फस्त केली आहे. आता ही टोळधाड महाराष्ट्रातही आली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला,,नागपूर  या जिल्ह्यात आता टोळधाड आली आहे.

 टोळधाडीने या जिल्ह्यातील हिरव्यागार पिकांवर हल्ला केला आहे. भाजीपाला, तृणधान्ये व संत्री मोसंबी सारख्या फळबागा या टोळधाडा फस्त करीत आहे. टोळधाडांचा या हल्ल्याने या भागातील बळीराजाचे अपरिमित नुकसान  झाले आहे. टोळधाडीच्या या हल्ल्याने बळीराजा हतबल झाला आहे. आधीच दुष्काळ, अवकाळी पाऊस, आणि कोरोनाने हतबल झालेल्या बळीराजापुढे   टोळधाडीचे नवे संकट उभे ठाकले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. आता ही  टोळधाड हटवण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलायला हवीत. कीटकनाशकांची फवारणी, तीव्र क्षमतेच्या केमिकलची धुराळणी, आवाजाचा वापर, ड्रोनद्वारे कीटकनाशकांची फवारणी असे उपाय करुन टोळधाडीला परतवून लावता येऊ शकते. टोळधाडीचे सध्याचे उग्र रूप पाहता हे उपाय तकलादू ठरू शकतात पण टोळधाड रोखण्यासाठी या उपायांशीवाय दुसरा कोणता उपायही समोर दिसत नाही. सरकारने टोळधाडीचे  संकट गांभीर्याने हाताळून बळीराजाला दिलासा द्यायला हवा. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
 दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...