करोनाच्या संकटामुळे राज्याला मिळणार्या महसुलाच्या वाटा बंद असल्यामुळे त्याचा राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर साहजिकच परिणाम होत आहे. परंतु आज करोनाला मुकाबला देण्यासाठी आणि प्रामुख्याने सर्वप्रथम त्यालाच प्राधान्य देणे महत्वाचे आहे यात वाद नाही म्हणूनच त्या साठी निधि कमी पडता कामा नये, करोनाविरुद्ध लढण्यासाठी निधि अभावी कोणत्याच आयुधांची कमतरता जाणवू नये. जीवापेक्षा लाख मोलाचे या जगात काहीच नाही. या विचारातून २०१९च्या अर्थसंकल्पात समविष्ट असलेल्या अत्यंत अत्यावश्यक कामे सोडून जी फक्त कागदावर आहेत, कार्यारंभाचा ज्या कामाना आदेश दिला गेलेला नाही, जी कामे सुरू झालेली नाहीत त्यांना कात्री लावणार शिवाय सरकारी विभागातील, महामंडळे अथवा अन्य खात्यांकडे अखर्चिक रक्कम पडून आहे ती त्यांनी सरकारी खात्यात जमा करावी हा दिलेला शासनाचा आदेश वाचनात आला, एकंदरीत प्राप्तस्थिती, करोंनाच्या लढतीसाठी लागणारा निधि वगैरे विचार करता शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य, स्तुत्य असाच आहे. विकास कामे होत राहतील, पुढे मागे करताही येतील.
-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा