आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३१ मे, २०२०

गोष्ट साधी पण डोंगराएवढी.!

ते दोघे करोनाच्या दहशतीने पुण्याहून आपल्या गावाला आले. ज्या शाळेने अक्षर ओळख दिली, शिक्षणाचे दरवाजे उघडे केले, जिथ अभ्यास केला, मौज, मजाही केली त्याच शाळेत एक खबरदारी, सावधगिरी म्हणून क्वारंटाईन व्हायची वेळ आली. मिळालेल्या या वेळेचा काहीतरी उपयोग करावा हा करोनाच्या काळातही एक सकारात्मक विचार करून ज्या शाळेने आपणास अक्षरज्ञान दिले, तिचे काहीतरी आपण देणे लागतोय या उदात्त भावनेतून त्या दोघांनी गेली दोन अडीच महीने बंद असलेली शाळा, शाळेचे आवार, बगीचा श्रमदानाने स्वच्छ, चकाचक करण्याचा उपक्रम राबवून क्वारंटाईन काळातही ईच्छाशक्तीच्या बळावर समाज कार्य करू शकतो, एखादा विधायक उपक्रम राबवू शकतो हे दाखऊन  दिले. अशा या जबर इच्छाशक्ति असणार्‍या कोलोलीच्या नंदकुमार जाधव आणि सतीश चौगुले यांचे कार्य फार मोठे आहे, अनुकरणीय आहे, प्रेरणा देणारे आहे. इच्छाशक्ति, सकारात्मक मानसिकता आणि समाजिक कार्याची मुळात आवड हवी. बातमी  साधी, सोपी पण खूप काही सांगणारी, अनेकांना सांगून जाणारी.

-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...