ते दोघे करोनाच्या दहशतीने पुण्याहून आपल्या गावाला आले. ज्या शाळेने अक्षर ओळख दिली, शिक्षणाचे दरवाजे उघडे केले, जिथ अभ्यास केला, मौज, मजाही केली त्याच शाळेत एक खबरदारी, सावधगिरी म्हणून क्वारंटाईन व्हायची वेळ आली. मिळालेल्या या वेळेचा काहीतरी उपयोग करावा हा करोनाच्या काळातही एक सकारात्मक विचार करून ज्या शाळेने आपणास अक्षरज्ञान दिले, तिचे काहीतरी आपण देणे लागतोय या उदात्त भावनेतून त्या दोघांनी गेली दोन अडीच महीने बंद असलेली शाळा, शाळेचे आवार, बगीचा श्रमदानाने स्वच्छ, चकाचक करण्याचा उपक्रम राबवून क्वारंटाईन काळातही ईच्छाशक्तीच्या बळावर समाज कार्य करू शकतो, एखादा विधायक उपक्रम राबवू शकतो हे दाखऊन दिले. अशा या जबर इच्छाशक्ति असणार्या कोलोलीच्या नंदकुमार जाधव आणि सतीश चौगुले यांचे कार्य फार मोठे आहे, अनुकरणीय आहे, प्रेरणा देणारे आहे. इच्छाशक्ति, सकारात्मक मानसिकता आणि समाजिक कार्याची मुळात आवड हवी. बातमी साधी, सोपी पण खूप काही सांगणारी, अनेकांना सांगून जाणारी.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान
मुंबई (गणेश हिरवे) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा