मुंबई -(गणेश हिरवे)
आज वैश्विक कोरोना महामारीमुळे देशातील उद्योगधंदे व कारखाने बंद पडले आहेत. लाॅकडाउनचा फार मोठा तडाखा बारा बलुतेदार व अलुतेदार घटकांतील लहान-लहान व्यावसायिकांना बसला आहे.रेडिमेड गारमेंन्ट्समुळे अगोदरच टेलरिंग व्यवसायावर अवकळा आली आहे. लगीनसराईच्या काळात वर्षभराची तजवीज करुन ठेवणाऱ्या शिंपी समाजबांधव व्यावसायिक व कारागीरांवर ऐन लगीनसराईच्या काळामध्ये फार मोठे संकट कोसळले आहे. नुकतेच केंद्र सरकारने याबाबत उपाययोजना म्हणून २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये MSME सेक्टरसाठी ३ लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले.पारंपारिक चरितार्थाचे 'शिवणकाम' हे एकमेव साधन असलेल्या शिंपी समाजातील बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे व साधारण खेडेगावातील हा वर्ग सध्या लग्नसराई बंद असल्याने याला बळी पडलेला दिसून येत आहे व यासाठी या समाजाला मदत व्हावी व आर्थिक संकटातून ते बाहेर पडावे यासाठी नुकतेच अखिल भारतीय शिंपी समाज कोकण विभागीय अध्यक्ष रवींद्र कालेकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आर्थिक मदतीचे निवेदन मुख्यमंत्री व तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांना देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा