आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ मे, २०२०

आदर्श वार्ताहर -"समाज -संवाद"

" इकडे रोम जळतोय आणि तिकडे निरो फिडल वाजवतोय "

 मुंबईतील सरकारी रुग्णालयांची संख्या पाहिली आणि मनात एक विचार आला , अरे बापरे ! एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत फक्त १४ रूग्णालय आहेत . 
केइएम रूग्णालय (१९२६ )  लोकमान्य टिळक सायन रुग्णालय ( १९४७ )जे जे हॉस्पिटल (१८४५)नायर हॉस्पिटल ( १९२० )कस्तुरबा हॉस्पिटल  ( १९४५ )कुपर हॉस्पिटल ( १९६९ )टाटा हॉस्पिटल ( १९४१ )          गोकुळदास तेज. हॉस्पिटल  (१८७५ )  सैफी हॉस्पिटल   (१९४८ )   मुंबई डेंटल हॉस्पिटल (१९२३)   सेट वी शी गांधी  (१९५८)  भाटिया हॉस्पिटल(१९३२)भगवती हॉस्पिटल (१९६२)राजावाडी हॉस्पिटल (१९५६ )   या रूग्णालयात जनतेला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत .   आता सध्याच्या कोरोना संकटाच्या परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की राजकारणी नेते मंडळींनी स्वातंत्र्यानंतर मुंबई मध्ये किती नवीन हॉस्पिटल बांधली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे , या समस्येचा सामना करण्याची जबाबदारी कोणाची आहे .
१९४७ ते २०२९ अशा  ७३ वर्षाच्या कालावधीत विकास या शब्दाची राजकीय परिभाषा  नेमकी काय होती याचे मूल्यमापन करणे गरजेचे होते , आणि आज वर्तमानात हे होणे तेवढेच गरजेचे आहे. सात बेटांवर बसलेल्या आणि देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईला शहराची लोकसंख्या १९८५ साला नंतर झपाट्याने वाढली. १९४७ साली या शहराची लोकसंख्या ३०४०२७० इतकी होती आणि आज २०२० मध्ये २०४११०००  इतकी झालीआहे .अन्न, वस्त्र, निवारा यांशिवाय वैद्यकीय सुविधा ही देखील प्राथमिक गरज आहे, हे ब्रिटिश कालीन लोकांना आणि त्यावेळी अस्तिस्त्वात असलेल्या राजकीय नेत्यांना अवगत होते, परंतु हे ज्ञान १९४७  नंतर लोप पावत गेले. फक्त सत्तेसाठी **राजकारण** ही प्राथमिक गरज नव्याने निर्माण झाली आणि ती वैद्यकीय गरजेपेक्षा प्रचंड मोठी झाली आणि यातच वैद्यकीय सेवेचा विश्वासघात झाला. दिवस रात्र सत्तेच्या खुर्ची चा एकच ध्यास राजकीय नेत्यांना असतो . स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात आपण केईएम, जेजे, सायन हॉस्पिटलांसारखे एकही हॉस्पिटल उभारू शकलो नाही, हे राजकीय अपयश आहे, याबद्दल काहीच दुमत नाही. आजच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या राजकीय नेत्यांनी कधीही साधी खंत तरी व्यक्त केली आहे का ?आजार वाढले आहेत पण वैद्यकीय उपचार गरीबांना , मध्यम वर्गीयांना  परवडणारे नाहीत , पणअतिशय गंभीर आजारात देशातील एकही नेता मुंबईत वैद्यकीय उपचार घेत नाही . तर ही राजकीय नेते मंडळी अमेरीका, ब्रिटन, जर्मनी मध्ये वैद्यकीय उपचारा साठी जातात.पण जनतेचे काय ? मुंबईची ही अवस्था असेल तर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचे तीन तेरा वाजले आहेत, परंतु याबाबत बोलायला कोणीही तयार नाही.एकीकडे कोरोनाच्या संकटात जनतेला हाल सोसावे लागत आहेत , आणि दुसरीकडे राजकीय नेते राजकारण करण्यात व्यस्त आहेत . सध्या जे काय चाललंय ते चुकीचे आहे . एकंदरीत काय तर  " इकडे रोम जळतोय आणि तिकडे निरो फिडल वाजवतोय " अशी परिस्थिती आहे ‌

-लक्ष्मण राजे
मीरा रोड पूर्व

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...