स्वागतार्ह आणि अभिनंदनीय
लाखोंच्या संख्येने आबाल वृद्धासह वर्षानुवर्ष शांत, शिस्तबद्ध, भक्तिभावाने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जाणारी वारकर्यांची पायवारी आणि नेत्रदीपक पवित्र पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे एक पारंपरिक वैभव, शान परंतु यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, प्राप्त परिस्थिति ध्यानी घेऊन पालखी सोहळ्याचे आयोजन न करता केवळ मानकर्यामार्फत संतांच्या पादुका कुठेही न थांबवता वाहनातून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे घेऊन जाण्याचा प्रमुख अशा चार वारकरी संस्थांनी घेतलेला निर्णय वाचनात आला. या चार संस्थांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि अभिनंदनिय आहेच, अनुकरणीय सुद्धा आहे. आपल्या मुळे दुसर्याला त्रास, वेदना, दुख होऊ नये ही शिकवण माऊलीने, संतांनी दिली आणि तीच परंपरा वारकरी संप्रदायाने सुरू ठेवलीय शिवाय या निर्णयाने परंपरागत पादुका वारीची प्रथा सुद्धा चालू राहील. तमाम वारकरी बांधवाना मानाचा मुजरा.
-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा