आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २७ मे, २०२०

आदर्श वार्ताहर -"समाज -संवाद "

   फडणवीसाना महाराष्ट्राची चिंता ?

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता सरकार अनेक उपाययोजना करूनही तो आटोक्यात येत नाही हे दुःखदायक आहे.पण याही परिस्थितीत विरोधी पक्ष भाजप महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा येनकेन प्रयत्न करीत आहे .उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून ही प्रयत्न झाले होते पण आता हे सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले असून शेतकरी,मजूर आणि बारा बलुतेदार याची बाजू घेऊन फडणवीस आणि त्याची टीम राज्यपालांना भेटायला गेली होती.केंद्राचे पॅकेज कागदावरच असताना महाराष्ट्र सरकारने केंद्राप्रमाणे पॅकेज जाहीर करावे अशी विचित्र मागणीही फडणवीसांनी केली आहे.वास्तविक सरकार जर अपयशी असेल तर जनमानसात आंदोलने करून , टीका करून लक्ष वेधने हे विरोधी  पक्षाचे काम असू शकते पण त्यासाठी उठसुठ राज्यपालांना भेटणे योग्य नाही.महाराष्ट्रातून निवडून येऊनही काही दिवसांपूर्वी याच फडणवीस आणि त्यांच्या टीमने राजकीय द्वेषातून आपला निधी सीएम फंडात जमा न करता पीएम फंडात जमा केला त्यावेळी त्यांना महाराष्ट्राची चिंता नव्हती मग आताच यांना महाराष्ट्र बचावचा नारा देण्याचे का सुचले ? त्यामुळे फडणवीसाची ही महाराष्ट्राबद्दलची चिंता किती तकलादू आहे हे जनता जाणून आहे.खरेतर फडणवीसांनी महाराष्ट्राची चिंता करण्याचा हक्क केव्हाच गमावला आहे.

-अरुण पां. खटावकर
लालबाग ४०० ०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...