आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २९ मे, २०२०

आदर्श वार्ताहर -"काव्यांगण "

जगबुडी झाली तरी...!
.............................

यंदा नाही पडणार दुष्काळ
नाही येणार आणीबाणी
डोळ्यांत इतकं साचलय...
काळजाचंही झाले पाणीपाणी

यंदा महागाईही नाही जाणवणार
अन्नधान्याचा तुटवडा नाही भासणार
पदराची गाठच सुटलीय...
तिथे पैसे तरी कुठून आणणार?

यंदा सावकार, बँक नाही ओरडणार
कर्जही नवे नाही घ्यावे लागणार
पाठीवर आसुडाचे वळ ओलेच आहेत
फुंकर तरी कुणाला मारायला सांगणार

घरात नाही होणार मंगलकार्य
अंत्यविधीही अर्धवट रहाणार
सगळे शास्त्र ठरले थोतांड
मनाला कायमची सल बोचणार

काहीही घडत असले तरी...
धीर नाही सोडायचा
जगबुडी जरी झाली तरी
लाटा वेचत किनारा गाठायचा !

- कांतीलाल कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...