आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

वंचिताना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र या. -श्रुती म्हात्रे

उरण -कामगारांना, प्रकल्पग्रस्तांना आज योग्य न्याय मिळत नाही. अनेक वर्षांपासून येथील वंचित घटक विविध सेवा सुविधा पासून वंचित राहला आहे.कामगारांवर,प्रकल्पग्रस्तांना गृहीत धरले जात आहे. त्यामुळे सर्व कामगारांनी एकत्र येऊन आपली शक्ती दाखवायची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन अन्याया विरोधात लढा उभारूया असे आवाहन कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी केले.

    दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या प्रेरणेतून स्थापन केलेल्या एकता कॅटलीस्ट या संघटनेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त जे.एन.पी.टि टाउनशिपच्या मल्टीपर्पज हॉल मध्ये प्रकल्पग्रस्त, कामगार व ओबीसी समाजाच्या मेळाव्याचे व एकता कॅटलीस्टच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

    जेष्ठ कामगार नेते पनवेल उरण रायगडचे भाग्य विधाते लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील साहेब यांची संघर्षाची धग धगती मशाल त्यांच्या पश्चताप दिवंगत जेष्ठ कामगार श्याम म्हात्रे साहेब यांनी हातात घेतली आणि ती धग धगत ठेवली. दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब आणि दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांचा ओबीसी, वंचित घटकांचा अपूर्ण लढा पूर्ण करण्यासाठी, प्रकल्पग्रस्तांचे, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात ही चळवळ संघर्षाच्या रूपाने व्यापक करण्याचा दृष्टीकोण असल्याचे कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

    ओबीसी समाज, इतर मागासवर्ग /व्ही जे एन टी समाजाला राजकीय सत्तेत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य वाटा मिळत नाही त्यासाठी ओबीसीचे राजकीय हक्काचा लढा उभारण्यासाठी व चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी या लढ्याचा एक भाग म्हणून श्रुती म्हात्रे यांची ओबीसी /व्ही जे एन टी जनमोर्चा संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. या नेमणूकी बद्दल त्यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आले.

   नवी मुंबई, पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यातील कामगार, मच्छिमार, एम आय डी सी प्रकल्पग्रस्त, शेतकरी, महाराष्ट्रातील ओबीसीचे विविध संघटना व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व कामगारांना, प्रकल्पग्रस्तांना कामगार कायदे, कामगारांच्या विविध समस्यांवर तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात आले.

     ओबीसी /व्ही जे एन टी जनमोर्चा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, उपाध्यक्ष राजूभाऊ साळुंके,महासचिव बालाजी शिंदे,राज्य संघटक -अनिल पवार,प्रदेश सरचिटणीस - संजीवकुमार जाधव,मल्हार आर्मी अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे,काकासाहेब मारकड,सदानंद भोपी,रामनाथ पाटील आदी मान्यवर तसेच कोकण श्रमिक संघ, बी एम टी सी कर्मचारी पुनर्वसन समिती, ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चा संघटनेचे पदाधिकारी सदस्य यावेळी  उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवकुमार जाधव, मारुती शेरकर तर आभार प्रदर्शन पंकज भगत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...