आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

धान खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस दि.30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ

अलिबाग :- जिल्ह्यात दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय जव्हार या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत किमान आधारभूत किंमत धानखरेदी योजनेंतर्गत अनुक्रमे 38 धान खरेदी केंद व 01 धान खरेदी केंद्र शासनाने मंजूर केले आहे. दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांचे अजून 05 धानखरेदी केंद्र मंजूरीची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.

   जिल्हयातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात पिकवलेले धानाची (भाताची) खरेदी ही खरीप पणन हंगाम: दि.01 ऑक्टोंबर 2021 ते दि.31 जानेवारी 2022 व रब्बी/उन्हाळी हंगाम:- दि.01 मे 2022 ते दि.30 जून 2022 या कालावधीत केली जाणार आहे.

    तालुका हद्दीमध्ये कोणत्याही गावातील शेतकरी त्याच्या इच्छेनुसार तालुक्यातील कोणत्याही खरेदी केंद्रावर धान विक्री करु शकतो. त्यानुसार धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय नोंद खरेदी केंद्रावरील रजिस्टरमध्ये करण्यात यावी,  जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.तसेच पणन हंगाम 2021-2022 मध्ये विकेंद्रित धान खरेदी योजनेंतर्गत पुरेशा प्रमाणावर शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नसल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस दि.30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुढे मुदतवाढ देण्यांत येणार नाही. सर्व इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदी करुन घ्याव्यात.

   जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र स्थापन करणे, धान खरेदी करणे, शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी करणे, शेतकऱ्यांना विहित कालावधीत त्यांनी विक्री केलेल्या धानाचा मोबदला मिळणे व बोनस मिळणे व इतर बाबींच्या अनुषंगाने काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा पणन अधिकारी रायगड, श्री.केशव बी. ताटे, मो.7718064716 व  प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार, श्री. विजय गांगुर्डे, मो.7738285566 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...