आप आपल्या परीने दिवा लावत गेले तर सूर्य उगवायची वाट पहावी लागत नाही. तसेच काहीसे यूथकौन्सिल नेरुळ च्या तुळशी संवर्धन उपक्रमाचे आहे. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांतून तुळशी रोपे वाटत गेले तर त्याची व्याप्ती अधिक वाढून त्याचा वैज्ञानिक तसेच धार्मिक लाभ जनसामान्यास होऊ शकतो. असे सांगुन आफळे बुवा पुढे म्हणाले की, उपासना ही प्रत्येक क्षेत्रात आहे. आणि संसार सुखी करण्यासाठी ती आवश्यक आहे. धर्मशास्त्राच महत्व आपल्या जीवनात खूप आहे. आपल्या धर्मशास्त्राने आयुर्वेदालाच धर्मशास्राच रुप दिल आहे. म्हणूनच ज्योतिष शास्त्राबरोबरच धार्मिक साधनेतून सर्वार्थानं समाज उन्नती साधण्याचा पंडीत जितेंद्र कुलकर्णी यांचा प्रयत्न खूप चांगला आहे. यातून ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करत आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये मांगल्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.
पंडीत जितेंद्र कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले तर ज्योतिष कार्यालयातील कर्मचारीवर्गाने खूप मेहनत घेऊन सत्यनारायण पुजेचे मांगल्य जपत तो यशस्वी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा