सध्या देशातील व राज्यातील राजकीय क्षेत्रात राजकारणाचा दर्जा काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या भाषणातून किंव्हा प्रसार माध्यमां समोर वक्तव्य करताना अत्यंत खालावत चाललेला असल्याचे, जनतेला जाणवत आहे. राजकारणात विरोधक असावेतच व राज्य कर्त्यांवर वचकहि असावा हे सर्वमान्य आहेच. परंतु सर्व जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी, आपल्या समृद्ध भारत देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान,मंत्री, व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री,मंत्री खासदार व आमदार यांनी आदर बाळगून जनतेसमोर सन्मानाने बोलायला हवे. कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांवर वैयक्तिक टीकाटिपणी न करता चांगल्या सुसंस्कृत भाषेत विचारांचे आदान प्रदान करणे आवश्यक आहे. जनतेसमोर भाषण देताना किंव्हा प्रसार माध्यमांशी बोलताना, समाजात विपरीत प्रतिक्रिया उमटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे व त्याचे नेहमीच भान राखले पाहिजे.. कोणतेही विधान करताना वा चुकीची हीन दर्जाची भाषा वापरताना आपण जनतेचे निडून दिलेले प्रतिनिधी म्हणून समाजात वावरत असतो याची जाण ठेवणे आवश्यक आहे उगाचच जनतेची दिशाभूल करू नये व तरुण पिढीसमोर चांगले आदर्श संस्कार ठेवावेत. नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते जे पक्षासाठी आहोरात्र मेहनत करीत असतात व नागरिकांमद्धे आपापसात वादविवाद होऊन भांडणे होतात त्याचे रूपांतर आंदोलने, हिंसक प्रकार होण्यात होते त्यामुळे विनाकारण अशी हिंसक परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला अश्रूधूर, लाठीचार्ज, करावा लागतो त्यातून कार्यकर्त्यांना अटक केली जाते त्यांचेवर गुन्हे दाखल केले जातात. यामद्धे विनाकारणच तरुणपिढी भरकटली जात आहे त्यांना योग्य दिशा दाखवून, चांगले संस्कार घडवून देशाच्या प्रगतीच्या प्रवाहामद्धे त्यांचा सदुपयोग करणे आवश्यक वाटते तसेच लोकप्रतिनिधींनी समाजासमोर चांगले विचार मांडणे हि काळाची गरज आहे
-प्रदीप पंढरीनाथ जोशी, घणसोली, नवी मुंबई
(वृत्तपत्रलेखक व मुक्त पत्रकार )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा