आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

अल्पशा आजाराने एक वादळ शमलं ; मोहनराव पुतळजी येलवे यांचे निधन


रायगड
- म्हसळे तालुक्यातील बौद्ध समाजाचे एक थोर आणि धुरंधर नेते मोहनराव पुतळजी येलवे यांचं निधन वयाच्या सत्तरव्या वर्षी दि. 15 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी कांदिवली येथे झालं. येलवे साहेबांची थोरवी गावी तेव्हढी कमीच असेल. समाजासाठी केलेलं कार्य आणि त्यांचं योगदान हे केव्हाही सर्वश्रेष्ठच असेल. म्हसळे तालुका बौद्धजन समितीची स्थापना करुन हरिश्चंद्र स. मोहिते साहेबांनंतर अनेक वर्ष ते ह्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना करुन भव्य असं सभागृह उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. येलवे साहेबांचा स्वभाव हा परिस्थितिनूरुप असे. प्रसंगी ते खुप कठोर भुमिका घेत असंत, ते तितकेच शांत आणि संयमीही होते. कार्यकर्त्यांमधे त्यांचा दबदबा नेहमीच असे. कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्णत्वला नेई पर्यंत थांबणे हे त्यांच्या स्वभावातच नसे. राजकारणातल्या बड्या-बड्या नेत्यांशी त्यांची उठक बैठक असे. संपुर्ण जंजीरा विभागामधे ते प्रसिद्ध होते, पंचक्रोशीत त्यांचा बोलबाला होता. बृहन्मुंबई महानगर पालिकामधून ते प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या स्वभावामधे नेहमी आपलेपण दडलेले होते म्हणून ते नेहमी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बोलतना एकेरी भाषेचा उल्लेख असे. समाज, राजकारण, नोकरी अश्या अनेक बाबी त्यांने मोठ्या जबाबदारीने पाडल्या होत्या. संपुर्ण समाज आज शोकाकुल अवस्थेत असुन त्यांचं निरंतर स्मरण करेल. त्यांच्या तालमित त्यांने अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांच्या कारकिर्दीत त्याने अनेक कार्यक्रम राबवले मग  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असो वा आरोग्य शिबिर असो असे अनेक कार्यक्रम त्यांने जबाबदारीने व अथक  परिश्रमाने पार पाडले. लोकांप्रती आणि समाजाप्रती एक जाज्वल्य अभिमान असणारा नेता येलवे साहेबांसारखा पुन्हा होणे नाही. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: