आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

राज्यभरातील सरपंच महाराष्ट्र सरकार बरोबर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील : बाबा साहेब पावसे पाटील

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोणा महामारीने थैमान घातले आहे यासाठी उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील सर्व घटक पक्ष अहोरात्र मेहनत घेत आहे  मंत्री ना जयंत पाटील यांच्या नुकतीच पत्रकार परिषदेत घेऊन सरपंच यांना कोरोणाच्या बाबतचे अहवानाला प्रतिसाद देत राज्यभर सरपंच गावपातळीवर सक्षम पणे काम करत आहे परंतू सरपंच यांना कोणतीही आरोग्य किट किंवा यांना कोणतेही आरोग्य संरक्षण नाही याची सरकारने दखल घ्या आम्ही जनतेची तशी पण काळजी घेतो यापुर्वी पण घेतली यापुढे घेऊन यात शंका नाही परंतू सरपंच आणि यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी सरपंच सेवा संघाच्या वतीने एका पत्रकाद्वारे मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांना एका पत्रकाद्वारे दिली आहे अशी माहिती संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्यांनी केली आहे आम्ही सरकार सोबत आहोत जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन गावपातळीवर काम करत आहे यासाठी आरोग्य सेवक ,आरोग्य यंत्रणा , स्वयंसेवी डॉक्टर , ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी ,शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर पोलिस,उघोजक , जिल्हा परिषद यंत्रणा ,पंचायत समितीची यंत्रणा  सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य ,पोलिस प्रशासन तसेच स्वयमसेवी संस्था अशी अनेक घटक कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतं आहे ग्रामिण भागातील सर्व विकास कामे ठप्प झाली आहे उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने काही पाणी टंचाई निर्माण झाली आहे सरपंच आपल्या गावची काळजी प्रशासनाच्या सहकार्य गावातील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने गांवात करत आहे तसेच कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असते काही युवक कार्यकर्ते आपआपल्या परीने सुध्दा डाॅक्टराशी संपर्क साधून सेवा करत आहे याची दखल शासनाने घ्यावी याची कोरोणा योध्दा म्हणून शासनाने याची नोंद करावी भविष्यात शासनाच्या विविध विकास कामे योजना तशी कोरोणा योध्दाचा पण एक विशिष्ट प्रकारची योजना तशी तयार करावी म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत अशी योध्दा यांना बळ मिळाले आणि भविष्यात कोणतीही परीस्थिती निर्माण झाली तरी आपल्या महाराष्ट्रात कोरोणा योध्दा ची अद्ययावत माहिती शासनाकडे असलेल्यास हि लोक महाराष्ट्रात वेगळे अडचणी च्या काळात भरीव योगदान देतील यात शंका नाही तरी शासनाने केलेल्या अहवानास सरपंच सेवा संघ गंभीरपणे दखल घेऊन कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र भर सरपंचांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करेल अशी ग्वाही सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने बाबासाहेब पावसे संगमनेर, राज्य महीला अध्यक्षा सौ प्रमिला एखंडे राज्य महिला उपक्षा सौ लक्ष्मी चांदणे महादेव पाटील यादवराव पावसे, समन्वयक पाचभाई  उपाध्यक्ष महेश पाटील रविंद्र दोरगे भाऊ मरगळे, रविंद्र पवार, रविंद्र पावसे, रविराज गाटे ,अंजन गोस्वामी,भाग्यश्री नरवडे, नवनाथ शिंदे , शंकरराव खेमनर पंकज चव्हाण अँड भाऊसाहेब गुंजाळ, गणेश तायडे, मयुर कोरडे , रोहित पवार, निलेश पावसे, चंद्रशेखर पाटील,सौ विजया कचावार, संजय पेटकर,  राज्य कार्यकारिणी विभागीय कार्यकारणी जिल्हा कार्यकारिणी तालुका सर्व समन्वयक सह कार्यकारिणी सदस्यांनी एका पत्रकाद्वारे शासनाला दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: