आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी ? आर .पी. एफ ,जी .आर .पी, पोलिस यंत्रणा काय करत होती ? मनसे शाखाअध्यक्ष मोहन चिराथ यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला जाब

मुंबई / किशोर गावडे- वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्स्प्रेस प्रचंड वेगाने येत होती. हि अंध  माता  फलाटावर मुलासह गेली, आणि तेवढ्यात होणारा अपघात अनर्थ  सुदैवाने आणि  रेल्वे पॉईंटमंन मयूर शेळके यांच्या  धाडसी कामगिरीने टळला.हे सत्य नाकारता येणार नाही.मयूर शेळके यांचा पुनर्जन्म  म्हणावा लागेल. त्यांच्या धाडसाचं कौतुक करावे लागेल. हृदय पिळवटून टाकणारा तो क्षण होता.परंतु, कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थितीत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाचे निर्बंध असताना ते मायलेक  स्थानकात गेले कसे काय ?

पोलिस यंत्रणा काय करत होती? असा सवाल  महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक ११० चे शाखाध्यक्ष  मोहन चिराथ यांनी विचारला आहे.मयूर शेळके हा रेल्वे पॉईंटमंन जर तेथे नसता प्रसंगावधान राखून त्यांनी त्या बालकाचा जीव वाचवला नसता, तर होत्याचे नव्हते झाले असते. याची गंभीर नोंद रेल्वे प्रशासन घेईल का? असाही सवाल  मोहन चिराथ यांनी केला आहे.

   शेळके यांचे कौतुक करायलाच हवे. वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने ते केलेच. परंतु दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे की महिला व मुलगा आत फलाटावर आलेच कसे? त्यांना कोणी अडवले नाही का?आर .पी. एफ ,जी .आर .पी, पोलिस यंत्रणा काय करत होती? कार्यरत होती की नव्हती .आणि असेल तर कोण कोण होते?.

    त्यावेळी ते फलाटावर काय करत होते? याचीही चौकशी  कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत चिराथ यांनी व्यक्त केले.दरम्यान, रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात  मयूर शेळके यांच्यासारखे सतर्क कामगार असतीलच असे नाही. त्यामुळे धोरणात्मक कार्यपद्धतीनुसार या अपघाताचा केवळ सत्कार करण्यापर्यंत आनंद व्यक्त न करता, हे नेमके घडलेच कसे?  याच्या मुळापर्यंत जायला हवे. शेळके यांची पदोन्नती व्हायला हवी. असे मत मोहन चिराथ यांनी  व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: