ठाणे(मुनिर खान/शांत्ताराम गुडेकर)
कोरोना महामारी मुळे राज्य सरकारने राज्यामध्ये लॉक डाऊन जाहीर केला आहे त्यामुळे हातावर पोट भरणारे गोरगरीब जनता आणि मजूर आणि रिक्षाचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सरकारने जाहीर केले होते की रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १५००( पंधराशे) रुपये अनुदान देण्यात येईल परंतु पुन्हा १५ दिवस लाँकडाऊन वाढवले पण अद्यापही अनुदान मिळालेले नाही ठाण्यामध्ये आत्तापर्यंत गोरगरिबांना मोफत रेशन सुद्धा मिळाला नाही त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते तथा कामगार आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ कांबळे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा