आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३१ मार्च, २०२१

एप्रिल फुल

    आज १ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण दिवस जगात एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. फुल ( fool ) म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. आपणही या  दिवशी कोणाला तरी मूर्ख बनवलेच असेल. दुसऱ्याला मूर्ख बनवून एप्रिल फुल करण्याचा आनंद यापण सगळ्यांनीच लुटला असेल. एप्रिल फुल या प्रथेची सुरवात कधी झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही. याबाबत अनेक कथा प्रचलित आहे त्यातल्या एका फ्रेंच कथेनुसार पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरत होते त्या कॅलेंडरप्रमाणे नववर्षाची सुरवात २५ मार्च ते १ एप्रिल या आठवड्यात होत असे. या आठवड्यात सगळे लोक वसंत ऋतूचे स्वागत आणि १ एप्रिलला नववर्ष साजरे करीत असत. मात्र १५८२ सालापासून फ्रेंच लोकांनी ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले. या कॅलेंडर नुसार १ जानेवारीपासून पासून नववर्षाचा प्रारंभ होतो. हा बदल तेथील  ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना माहीत नव्हता ते १ एप्रिलाच नववर्ष साजरा करीत त्यामुळे या लोकांना तेथील उच्चभ्रू , सुशिक्षित लोक मूर्ख ( fool ) म्हणत. जे लोक १ एप्रिलला नववर्ष साजरा करीत त्यांना फ्रांसमध्ये एप्रिल फुल असे संबोधले जाई. अशा तऱ्हेने १ एप्रिलला एप्रिल फुल करण्याची प्रथा जगभर पसरली. फ्रेंच लोक भारतात आल्यानंतर भारतातही ही प्रथा सुरू झाली. १ एप्रिलला आपले मित्र, नातेवाईक यांना एप्रिल फुल करण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. काळानुसार बदल होत आता लोक फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर या सोशल मीडियांच्या माध्यमातून एकमेकांना एप्रिल फुल करीत आहेत.  आपल्या मित्रांना,  नातेवाईकांना एप्रिल फुल करून त्यातून मिळणारा आनंद हा क्षणिक असला तरी तो आजच्या धकाधकीच्या जीवनात मोलाचा आहे. दुसऱ्यांना एप्रिल फुल बनवताना प्रत्येकाने  स्वतःमधील वाईट प्रवृत्तीलाही एप्रिल फुल बनवावे. दररोज उशिरा उठण्याच्या सवयीला लवकर उठून व्यायाम करून एप्रिल  फुल करावे. दररोज मोबाईल वापराच्या सवयीला एप्रिल फुल करून  एखादे छानसे पुस्तक वाचावे. सर्वांशी जिव्हाळ्याने वागून आपल्यातील अहंकाराला एप्रिल फुल करावे. गरजवंताला मदत करून स्वार्थाला एप्रिलफुल करावे. मोठेपणाला एप्रिलफुल करून लहान मुलांशी खेळावे. स्वतःच्या मी पणाला एप्रिलफुल करुन आम्ही बनून समाजात वावरल्यास एकमेकांविषयी असलेली कटुता कमी होईल आणि प्रत्येकाला  जीवनाचा आनंद घेता येईल.

-श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...