हुंडा एक अनिष्ट प्रथा या समाजात रुजलेली आहे. हुंडा देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असला तरी ही प्रथा समाजात अजूनही चालूच आहे. या प्रथेला विरोध मुलींनी त्यांच्या आई वडिलांनी केला पाहिजे. अनेक संस्था संघटनांनी त्यास विरोध केला पाहिजे. संस्था संघटना विरोध करतात. पण तो तीव्र स्वरूपाचा हवा.
हुंडा घेणाऱ्याशी मी लग्नच करणार नाही. अशी निर्भय प्रतिक्रिया ,प्रतिज्ञा मुलींनी आवाज उठवून केली पाहिजे. मुलगी सुखात आहे स्थळ चांगले आहे. असल्यास आई-वडिल खुशीने राजी होऊन मुलीच्या सुखासाठी हुंडा देण्यास तयार होतात. पण सुखास चटावलेल्या तसेच विनासायास मिळणाऱ्या पैशावर मुलाची सासरची मंडळी दिवसाढवळ्या एक प्रकारची हुंड्यापायी लुटच करतात.माणसाला कष्टाचा पैसा पुरत नाही. हुंड्यापायी घेतलेला पैसा हरामाचा पैसा माणसाला कधीच कधीच पुरा पडत नाही . हरामाचा पैसा आजारपणात नाहीतर आणि अन्य कारणांनी असाच खर्च होऊन जातो. हुंडा अनिष्ट प्रथा आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे सुद्धा हुंडा मागतात. याचे आश्चर्य वाटते. हे स्वतःला श्रीमंत म्हणतात आणि चांगल्या शिकलेल्या मुली सुद्धा अशा पुरुषान पुढे का हार मानतात हेच कळत नाही. मग डॉक्टर, वकील इंजिनिअर उच्च शिक्षण घेऊन त्याचा उपयोग तरी काय? हुंड्या साठी सासरची मंडळी छळ करीत असतील तर त्या घरी मुलीने राहूच नये. सरळ घटस्फोट घेऊन वेगळा संसार थाटावा जाळून घेऊन किंवा गळफास घेऊन लावू नये.समाजा मध्ये लोक आपल्याला आई-वडिलांना काय म्हणतील याचा विचार करू नये. ऐकावे जनाचे करावे मनाचे समाजामध्ये प्रत्येक वाईट गोष्टीला नाव ठेवणारी माणसे असतात. समाज काही पायी चालू देत नाही की घोड्यावर बसू देत नाही. आता तर बऱ्याच ठिकाणी महागाईमुळे पती-पत्नी दोघेही कमावतात .पत्नी पुरुषाप्रमाणे नोकरी करते पैसे कमावते .असे असताना हुंड्यासाठी स्त्रीचा चा छळ का करतात? मग हुंड्यासाठी एका स्त्रीशी पत्नीशी असे वागणे योग्य नाही योग्य नाही.हे त्यांना कळत नाही का ? मुलींना लग्नात हुंडा द्यावा लागतो. म्हणून काही समाजात राज्यात मुलींना जन्मल्यानंतर लगेच मारले जाते. तसेच त्यांच्या आरोग्याकडे मुलांच्या तुलनेत कमी लक्ष दिले जाते .हुंड्याच्या त्रासामुळे तसेच भ्रूण हत्तेमुळे मुलींचे प्रमाण घटत आहे.
जो पर्यंत या समाजात ऐतखाऊ आयत्या बिळावर नागोबा असे नवरे मुलगे आहेत. तोपर्यंत म्हणजे ही प्रथा बंद होऊ शकत नाही. पण त्याला वेसण घालण्यासाठी ची ताकद महिलांमध्ये आहे. त्याचा त्यांनी उपयोग मात्र जरूर करावा. तसे पाहिले तर महिला एक एक महान शक्ती आहे. त्यांनी मनात आणले तर तीला काहीच अशक्य नाही, महाकाली, चंडिका, देवी पद्मावतीचे विशाल सामर्थ्य असलेले महाभयंकर रुप आहे. आपल्याला जन्म देणाऱ्या आईशी बहिणीशी आपण चांगले वागतो बोलतो. वो दिन दूर नही फिरसे पांच पांडवोंकी एक द्रौपदी युग वापस आयेगा? येणाऱ्या पिढीने आताच्या पिढीला शिव्याशाप देऊ नये. यासाठी तरी बाबांनो हुंड्यापायी मुलींचा स्त्रियांचा बळी घेऊ नका. असे हात जोडून विनंती करावीशी वाटते. ऐकाल ना? हुंड्याच्या राक्षसाला भस्मासहित जमिनीत गाडावे. सर्वत्र नांदो सुखी शांतता संसाराचा गाडा. सुखी संसाराचा गाडा.लेखक: सुभाष शांताराम जैनसाईनाथ सोसायटी, वर्तक नगर, ठाणे ४००६०६मोबाईल : 8779348256/mo 9821821885
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा