आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ मार्च, २०२१

लस पूर्ण सुरक्षित आहे मी घेतली तुम्ही पण घ्या...

    राज्यात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहे.  राज्यात दररोज तीस हजारांहून अधिक  लोक कोरोना बाधित होत आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.  कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी व कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी  कोरोना प्रतिबंधक लसीकरण देशभर सुरू आहे. हेल्थ वर्कर्स  तसेच फ्रंट लाईन वर्कर्स यांचे  लसीकरण पूर्ण  झाले असून आता ६० वर्षावरील वृद्ध तसेच ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरु असून १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील सर्वाना कोरोनावरील लस मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने  सर्वांचे लसीकरण होणार आहे. संपुर्ण देशात लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी खूप मेहनत घेत आहेत पण काही महाभाग लसीकरणाबाबत अफवा पसरवीत आहेत त्यामुळे लसीकरणाबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे. लसीकरणाबाबत सोशल मीडियातून अफवा पसरवणारे मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण व्हावा हाच त्यामागचा उद्देश आहे. लसीकरणाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.  सोशल मीडियावरुन लसीकरणाबाबत ज्या अफवा पसरल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत हे मी माझ्या अनुभवावरुन सांगू इच्छितो.  मी कोरोना वरील कोव्हीशिल्ड लसीचे  दोन्ही डोस घेतले असून लसीकरणानंतर मला कोणताही त्रास जाणवला नाही. लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लस ही कोरोनाच्या महामारीविरोधातील एकमेव असे शस्त्र आहे की ज्याचा वापर केल्यामुळे या आजारापासून दूर राहण्याची शक्यता अधिक आहे. मागील वर्षी जेंव्हा कोरोनाने आपल्या देशात शिरकाव केला तेंव्हापासून जो तो कोरोनावरील लस कधी येणार असा प्रश्न  विचारत होता. अनेक लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ या कामी दिवसरात्र काम करीत होते. देशातील डॉक्टरच नव्हे तर सर्वसामान्य व्यक्तीही लशीची वाट पाहत होते. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांनी कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे. आज लस उपलब्ध असताना सर्वानी तिचा लाभ घ्यायला हवा.  लसीकरणाबाबतच्या अफवांना बळी न पडता सर्वांनी लस घ्यावी. लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनानेही लसीकरण मोहिमेबाबत गाव, वाडी - वस्तीत जाऊन जनजागृती करायला हवी.  लस घेऊनच आपण कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकू शकतो. कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण मोहिमेत सर्वानी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. 

-श्याम बसप्पा ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...