अनाथांची माय ...थोर महिला समाजसेविका.. समाजभगिनी.' सिंधूताई सपकाळ ' यांना भारत सरकारने अत्यंत मानाची " पद्मश्री "पदवी पुरस्काराने गौरवांकित करुन गवळी समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल झाले आहे. फक्त समाज मर्यादित कार्य न करता सर्व समाज वंचितांना आपली आभाळभर माया देवून, अनाथांची माय म्हणून मातृत्वाचे आदर्श उदाहरण साऱ्या जगासमोर आणले.आजवर त्यांनी अनेक समस्यांना, प्रसंगांना समर्थपणे तोंड देत , वंचितांना मायेचा आधार देत अथक परिश्रम करून सामाजिक, शैक्षणिक , महिला सबलीकरण, अनाथालये, परित्यक्त्या महिलांना आधार, मुलामुलींची संभाळणुक करून ,त्यांना स्वतःच्या पायावर उभे करुन , त्यांना नोकरी उद्योग धंदे देऊन , त्यांची लग्ने लाऊन अनेक संसार उभे केले.आयुष्यभर त्यांच्या साठी भारतभर, जगभर वणवण भटकून भीक मागून त्यांच्या साठी अन्न धान्ये, कपडे , शैक्षणिक साहित्य गोळा करुन उदरनिर्वाह केला. प्रसंगी स्वतः च्या तब्बेतिची ,सुखाची पर्वा न करता केलेल्या कार्याचे या पुरस्काराने त्यांच्या मोल व श्रमाची पोचपावतीच दिली आहे.त्यांच्या या कार्य गौरवाचे गवळी सेवा फाऊंडेशन महा. सामाजिक संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन! या पुढील त्यांचे उर्वरित आयुष्य सुखसमाधानात, निरोगी , आरोग्य संप्पन्न, दीर्घायुषी जावो.हीच सदिच्छा ! सर्व गवळी सेवा फाऊंडेशन आणि गवळी समाज कायम आपल्या सोबत आहे.
- राजेश रमेश चौकेकर(गवळी)/ समाज सेवक/ पत्रकार
संपर्क : ७३७८५९०७०२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा