विरार ( पालघर ): पालघर जिल्ह्यात विरार पूर्व येते अयोध्या नगरीत सामाजिक अंतर ठेवत प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.यावेळी सोसायटीचे सर्व रहिवाशी,महिला वर्ग,छोटी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सर्वांनी एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवले होते.सर्वांनी मास्क लाऊन या सोहळ्यासाठी उपस्थिती दाखविली.सकाळी ९:०० वाजता सोसायटीचे अध्यक्ष दीपक गुरव यांच्या हस्ते भारतीय ध्वज फडकविण्यात आला.यावेळी मोठ्या उत्साहाने सर्व छोट्या मुलांनी देशभक्तीवरील गीत गायन केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज पवार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व,तसेच आपल्या जीवनातील संविधानाचे महत्त्व आपल्या वक्तव्यातून सर्वांसमोर मांडले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे अंकुश सावंत,जय पवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना जिलेबी देऊन तोंड गोड करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा