आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

चाचण्या सुरू राहणे महत्वाचे !

मुंबई शहरात एकेकाळी करोना बाधित होणार्‍यांच्या वाढीची संख्या सुमारे तीस ते पस्तीस टक्क्यावर गेलेली होती परंतु आज ती केंद्र, राज्य शासन, आरोग्य सेवेतील, पोलिस दलातील, समाज सेवक, नागरिक आदि सर्व करोना योद्ध्यांच्या अथक परिश्रमातून, तीन ते चार टक्क्यावर आल्याचे एक समाधान देणारे वृत्त वाचनात आले. मात्र करोना पुर्णपणे हद्दपार झालेला नाही हे ध्यानी ठेवून दक्षता आणि नियम पाळणे आजही आवश्यक आहेच. नाईलाजस्तव म्हणावं लागतय की आजही कांही करोनादृश्य लक्षणांकडे दुर्दैवाने लोक गांभीर्याने पाहत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात अस म्हटल्यास ते चुकीचे होईलच असे नाही आणि म्हणूनच बाधितांच्या संख्येत घट होत असली किंवा दिसत असली तरी करोना संपूर्णपणे हद्दपार झाल्याची खात्री होई पर्यंत चाचण्यांची जी संख्या तो आहे ती कायम राहणे आवश्यक असून त्यामध्ये मात्र घट करू नये, घट करून चालणार नाही. किंबहुना ग्रामीण भागातील छोट्या छोट्या शहरांमध्ये चाचणी केंद्रे उभारली जावयास हवीत. बधितांचा शोध चाचण्यातूनच मिळत राहतो त्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण वगैरे करून साखळीला अटकाव करण्यास मदत होते म्हणून चाचण्या सुरू राहणे महत्वाचे आहे त्यात घट नको. करोनाची हद्दपारीला चाचण्या हा एक प्रथम क्रमांकाचा मार्ग ठरू शकतोय.

-विश्वनाथ पंडित, ठाणे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...