मुंबई : शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी, भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेतला जातो. या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. जयवंत पाटील यांची काल झालेल्या ऑनलाईन बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त लोकशाहीर संभाजी भगत यांनी प्रा. पाटील यांचं नाव सुचवलं तर तत्कालीन संमेलनाध्यक्षा प्रज्ञा दया पवार आणि विश्वस्त अशोक बेलसरे यांनी अनुमोदन दिले. प्रा. जयवंत पाटील हे दीर्घकाळ शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलेलं आहे. कवी, साहित्यिक म्हणूनही ते परिचित आहेत. आगरी भाषेतील त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरही त्यांनी काम केलेलं आहे. सातव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा