आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. जयवंत पाटील यांची बिनविरोध निवड

 

मुंबई : शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी, भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेतला जातो. या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. जयवंत पाटील यांची काल झालेल्या ऑनलाईन बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त लोकशाहीर संभाजी भगत यांनी प्रा. पाटील यांचं नाव सुचवलं तर  तत्कालीन संमेलनाध्यक्षा प्रज्ञा दया पवार आणि विश्वस्त अशोक बेलसरे यांनी अनुमोदन दिले. प्रा. जयवंत पाटील हे दीर्घकाळ शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलेलं आहे. कवी, साहित्यिक म्हणूनही ते परिचित आहेत. आगरी भाषेतील त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरही त्यांनी काम केलेलं आहे. सातव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत.

   प्रा. पाटील यांच्या आधी सुप्रसिध्द साहित्यिका नीरजा या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी, गोंदिया, विरार येथे नऊ शिक्षक साहित्य संमेलनं दिमाखात पार पडलेली आहेत. काल झालेल्या बैठकीला नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिध्द साहित्यिका प्रज्ञा दया पवार याही होत्या. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आगामी दहावे शिक्षक साहित्य संमेलन ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत लवकर सविस्तर कळवण्यात येईल, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्यवाह मारुती शेरकर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...