आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

भारतासाठी खडतर दौरा

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वन डे, तीन टी२० आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. कोरोनामुळे मागील आठ ते नऊ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणाऱ्या भारतासाठी हा दौरा खडतर ठरणार आहे याचा प्रत्यय पहिल्याच वन डे सामन्यात आला. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची पिसे काढत तब्बल ३७५ धावांची मजल मारली. कर्णधार ऍरॉन फ्लिच आणि माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी धमाकेदार शकते झळकावली तर डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आक्रमक खेळ  करून त्यांना उत्कृष्ट साथ दिली. भारताचे सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल सोडून त्यांच्या धावा वाढवण्यात हातभारच लावला.  भारतीय फलंदाजांनी देखील निराशा केली. सुरवात चांगली होऊनही मधली फळी कोलमडली. मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर हे लवकर बाद झाल्याने भारतीय संघ दबावात आला त्यातून हार्दिक पांड्या व शिखर धवन यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण तोवर खूप उशीर झाला होता. या सामन्यात भारतीय संघ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरला. १९९१-९२ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला असताना जी जर्सी  वापरली तीच जर्सी यावेळी  भारतीय संघाने वापरून स्वतःला  रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यावेळी भारतीय संघाचा जो परफॉर्मन्स होता तसा होऊ नये हीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे कारण हा दौरा भारतीय संघासाची परीक्षा पाहणारा ठरणार आहे. मागील ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारताने वन डे आणि कसोटी मालिकेत विजय मिळवला होता पण त्यावेळी त्यांच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते यावेळी ते संघात आहेत त्यामुळे त्यांची फलंदाजी  मजबूत बनली आहे याचा प्रत्यय पहिल्याच सामन्यात आला आहे. भारतीय संघ देखील मागील वर्षीप्रमाणे बलवान राहिलेला नाही. धोनी, युवराज, रैनाच्या निवृत्तीनंतर आधीच कमकुवत झालेला भारतीय संघ रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे खूपच अडचणीत आला आहे. रोहित शर्मा हा भारताचा मुख्य फलंदाज आहे त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कामगिरी देखील  अप्रतिम अशीच आहे त्याची अनुपस्थिती भारताला मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे त्यात पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर जाणार आहे त्यामुळे भारतासाठी कसोटी मालिका जिंकणे मोठ्या जिकरीचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया मधील खेळपट्ट्याही भारतीय खेळाडूंना पोषक नाहीत. तिथे उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या असल्याने भारतीय फलंदाजांच्या मर्यादा उघड होतात. तंत्रशुद्ध फलंदाजच तिथे यशस्वी होतात हा इतिहास आहे त्यामुळे भारतीय संघाची यावेळी मोठी कसोटी लागणार आहे. 

-श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...