आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

११व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : ११व्या भारतीय अवयवदान दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संस्था (NOTTO) यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवयवदानाच्या मोहिमेत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या संस्थांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, सहाय्यक संचालक डॉ अरुण यादव आदी मान्यवर राज्य शासनाच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. अवयवदान मोहिमेत कार्यरत असणाऱ्या देशाच्या विविध राज्यांतील संस्थांनी या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती लावली. तसेच महाराष्ट्रातील ROTTO-SOTTO या अवयवदान उपक्रमातील अग्रगण्य संस्थेने अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबांचा सत्काराचा कार्यक्रम मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे आयोजित केला होता व सदर कार्यक्रमदेखील केंद्र शासनाच्या मुख्य कार्यक्रमास ऑनलाईन जोडण्यात आला होता. याप्रसंगी मेंदूमृत दात्यांचे नातलग सौ रंजना राजकुमार भोईर, श्री गणेश कुमार जाधव आणि श्री महेश विजय येरूनकर यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाच्या वतीने यावेळी महाराष्ट्रातील दोन संस्थांना (ROTTO आणि SOTTO) त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुरस्कृत करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यात त्यांनी प्रथमतः अवयवदान मोहिमेत काम करणाऱ्या डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व योगदान देणाऱ्या इतर सर्वांचेच अभिनंदन केले. तसेच अवयव प्रत्यारोपण कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून त्यासाठी मार्गदर्शक सूचना व ग्रीन कॉरिडोअर सुविधा राज्यात पूर्ण क्षमतेने उपलब्ध आहेत असेदेखील त्यांनी विषद केले. अवयवदान पार पडल्यानंतर गरीब रुग्णांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी, अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ५०० किमी पेक्षा अधिक अंतरासाठी हवाई मार्गे अवयव स्थानांतरासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक साहाय्य राज्याला उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत अत्यंत यावेळी मांडले. महाराष्ट्राला अवयवदानातील दोन पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभारदेखील मानले. केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी डॉ सुनील खापर्डे यांनी केईम रुग्णालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त दोन संस्थांना केंद्र शासनाच्या वतीने पुरस्कार दिले. यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाचे अवयव प्रत्यारोपण शाखेचे सहाय्यक संचालक डॉ अरुण यादव, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, ROTTO SOTTO च्या संचालिका डॉ सुजाता पटवर्धन, माजी संचालक डॉ रोबो गाजीवाला, सहसंचालक डॉ आकाश शुक्ला, ZTCC चे प्रतिनिधी, ROTTO SOTTO चे सल्लागार समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...