आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार

सातारा (प्रतिनिधी) - कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना "पोलिसमॅन ऑफ द मंथ" हा पुरस्कार देऊन पोलीस डिपार्टमेंट गौरव करते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे  पत्र पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी दिले.

   रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती दिली. पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सदकार्य केले ते पोलिसांनीच. आपण घरात सण साजरे करतो आणि पोलीस मात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर असतात. आपण सगळे कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी घरात बसलेलो तेव्हाही पोलीस आपल्यासाठी घराबाहेर होते. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य मधील सर्व सदस्य हे कायम पोलीस बंधू- भगिनींचा आदर करत आले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे पोलीस डिपार्टमेंट कडून जाहीर होणाऱ्या "पोलिसमॅन ऑफ द मंथ" या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पोलीस बंधू- भगिनींचा सन्मान करणार आहेत, असा मनोदय व्यक्त करत तसे पत्र दिले. तर कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. त्यासाठी कोरोनाच्या काळात ऑनलाइन जनजागृती शिबीर आयोजित केले ज्यात आतापर्यंत १०० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सांगताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार काढले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...