आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

मराठी चित्रपट निर्माता यांच्या अडी अडचणी सोडवणार — ना. बाळासाहेब थोरात.

मुंबई /  महेश्वर तेटांबे -नामदार श्री.बाळासाहेब थोरातजी  (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) तसेच मा.श्री.राजारामजी देशमुख साहेब (राजशिष्टाचार सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी दादर येथील टिळक भवन मध्ये संपन्न झालेल्या सभेमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून यां चर्चासत्रात चित्रपट निर्माता व कामगारांच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि खालील विषय मांडण्यात आले. 

१) मराठी चित्रपटांचे प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे. 
२) शासनाकडे सादर मराठी चित्रपट अनुदान प्रस्ताव परिक्षण न करता सरसकट अनुदान देऊन उपकृत करावे (२५० प्रस्ताव असून त्यांचे परिक्षण आणि ग्रेड यामध्ये आठ महिने अजून लागतील म्हणून विनाअट, विनापरिक्षण अनुदान द्यावे. 
३) चित्रपट कलाकार / कामगार / तंत्रज्ञ यांची अधिकृत नोंदणी सरकारकडे करण्यात यावी. 
४) कलाकर्मी यांना सरकारी पेन्शन योजना मध्ये बदल करून सुलभ योजना करावी. ५) मराठी चित्रपट अनुदान योजनेच्या काही अटी रद्द कराव्यात. या सर्व प्रश्नांवर आम्ही उपाय योजनाही सुचविलेल्या आहेत त्यावरही ताबडतोबीने कार्यवाही करण्याचे निर्देश मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांनी दिले. याप्रसंगी श्री. बाळासाहेब गोरे, (सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभाग) यांच्यासह देवेंद्र मोरे (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ), राजेंद्र बोडारे, विठ्ठल मांडवकर, तजेला बगाडे, दिपक गोडे, जयंत भालेकर, प्रिती जोखरे, संजय दिक्षित, रामदास अतकारी, विजय, आदी कलाकर्मी उपस्थित होते. या सभेत आमच्या मागण्यांबाबत सांस्कृतिक विभाग, महसूल विभाग, अर्थ विभाग यांच्या मा. मंत्री महोदय तसेच अधिकारी यांच्या सोबत पुढिल आठ ते दहा दिवसात एकत्रितपणे सभा करून मराठी चित्रपट व्यवसायात असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्वरित प्रयत्न केला जाणार आहे.असे देखील ठरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...