मुंबई/ लक्ष्मण राजे-
डोंबिवली स्टेशन वरुन सकाळी एका ठराविक वेळी ट्रेन पकडणे हे नित्याचेच झाले होते.तीच ट्रेन,तीच बसण्याची जागा,त्याच परिचित व्यक्ती,ओळख वाढत गेली की एक छान मैत्री जमते.संध्याकाळचीही तीच परिस्थिती ,ऑफिस सुटल्यावर सकाळचेच मित्र संध्याकाळच्या ठरलेल्या ट्रेनने डोंबिवलीत एकत्र स्टेशनवर उतरणे , तसेच डोंबिवली स्टेशन समोर असलेल्या हॉटेल मध्ये बसणे , चहा कॉफी आणि गप्पा हे नित्याचेच होते. या कालावधीत मौजमजा केली,पार्ट्या केल्या,पिकनिक केल्या, सर्व मित्रांनी जीवाची मुंबई केली.पण हे सर्व करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव झाली, आणि सामाजिक बांधिलकी जाणीव ठेवून आपटे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जनसेवा मंडळाची स्थापना करण्यात आली.गणेश जनसेवा मंडळ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी आपटे आणि प्रदीप जोशी यांची सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. या दोन्ही अनुभवी, प्रतिभावंत व्यक्तीरेखांच्या अधिपत्याखाली गणेश जनसेवा मंडळाची वाटचाल सुरू झाली.यात संजय वगळ,अशोक लंगडे, शिवराम चव्हाण, गजानन जोशी,शाम जोशी, ज्ञानेश्वर माळवदकर, सत्यवान मुसळे, जी.आर.जोशी, विजय मेंढे, प्रमोद जोशी, विजय वगळ, खंदारे वकील, उदय, कुर्डुरकर, डॅडी अशा अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या. गणेश जनसेवा मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमां संदर्भात आपटे , जोशी यांच्या घरी मिटींग होऊ लागल्या.सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण झाली, चर्चा झाली. त्यानंतर गणेश जनसेवा मंडळाच्या अनेक कार्यक्रमांना उपक्रमांना सुरुवात झाली. त्यात नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदीक आरोग्य शिबिर, देवदर्शन, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार , महिलांसाठी कौटुंबिक हळदीकुंकु समारंभ असे अनेक सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या राबविण्यात आले.अशी तीस वर्षे गेली, आता त्यातील काही मित्र आणि गणेश जनसेवा मंडळाचे सभासद वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांची मुल मोठी झाली,चांगल्या नोकरीत व्यस्त आहेत.तसेच गणेश जनसेवा मंडळाच्या या गोतवळयातील मुलांची लग्न झाली,त्यांना मुल झाली.आता हेच मित्र आपल्या मुलांसोबत,नातवंडे, सुनाच्या संसारात आनंदाने रमत आहेत. सर्वांची कारकीर्द समाधानकारक व यशोशिखरावरच आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने काम,धंदा, व्यवसाय, नोकरी यात यशस्वी झालेले आहेत. आपल्या या सामाजिक कार्यात आपल्या घरातुनही तेवढाच बहुमोल महत्त्वाचा कौटुंबिक पाठींबा मिळाला हे नसे थोडके ! सध्याच्या कोरोना संसर्गामुळे आमच्या भेटीगाठी होत नाहीत. परंतु सर्वांनींच दैदीप्यमान व गौरवशाली यश संपादन केलेल आहे. हे सांगाव तेवढ थोडच आहे.शेवटी काय,सरले ते दिवस आणि आता उरल्या फक्त आठवणी , पण आता मात्र पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली आहे. सर्व सभासद गणेश जनसेवा मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.असे मनोगत गणेश जनसेवा मंडळाच्या वतीने प्रवक्ते गुरुनाथ तिरपणकर यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा