आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० जुलै, २०२०

समाजसेवक चेतन दादा गायकर यांच्या प्रयत्नाने नागरी वस्तीतील समस्येचे निवारण


 
               
 अंबरनाथ( शैलेश सणस ) : जावसई गाव चोंडीपाडा शेलारचाळ येथील नागरी लोकवस्ती लगत रहदारीच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी  साठून  गाळ व शेवाळ तयार झाले होते .  या  साचलेल्या पाण्यातील वाटेवरून   नागरिकांना ये जा करताना  खूप त्रास सहन करावा  लागत होता . याबाबत तिथल्या नागरिकांनी फोनद्वारे कळवले असता  समाजसेवक चेतन दादा गायकर यांनी  नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन तेथील परिसराची पाहणी केली . देवा ग्रुप फाउंडेशन, शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून   गायकर यांनी प्रयत्न करताना  जागेच्या मालकाशी बोलून त्यांना होत असलेला त्रास समजावून सांगितला असता त्यांनी  ही सहकार्य करण्याचे  आश्वासन दिले व बाजूलाच असलेलं काँक्रीटपायवाट तोडून खाली ड्रेनेजपाईप टाकून पाणी जाण्यास  वाट बनून दिली व तोडलेले काँक्रीट पुन्हा सिमेंट च्या सहाय्याने बंद करून घेतले . तसेच नागरिकांचे आरोग्यधोक्यात येऊ नये यासाठी नालेसफाई करून घेतली .  परिसरातील लोकांचा रहदारीचा रस्ता सुरक्षित करून दिला . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...