अंबरनाथ( शैलेश सणस ) : जावसई गाव चोंडीपाडा शेलारचाळ येथील नागरी लोकवस्ती लगत रहदारीच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठून गाळ व शेवाळ तयार झाले होते . या साचलेल्या पाण्यातील वाटेवरून नागरिकांना ये जा करताना खूप त्रास सहन करावा लागत होता . याबाबत तिथल्या नागरिकांनी फोनद्वारे कळवले असता समाजसेवक चेतन दादा गायकर यांनी नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन तेथील परिसराची पाहणी केली . देवा ग्रुप फाउंडेशन, शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून गायकर यांनी प्रयत्न करताना जागेच्या मालकाशी बोलून त्यांना होत असलेला त्रास समजावून सांगितला असता त्यांनी ही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व बाजूलाच असलेलं काँक्रीटपायवाट तोडून खाली ड्रेनेजपाईप टाकून पाणी जाण्यास वाट बनून दिली व तोडलेले काँक्रीट पुन्हा सिमेंट च्या सहाय्याने बंद करून घेतले . तसेच नागरिकांचे आरोग्यधोक्यात येऊ नये यासाठी नालेसफाई करून घेतली . परिसरातील लोकांचा रहदारीचा रस्ता सुरक्षित करून दिला .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा