आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २९ मे, २०२०

श्री फाउंडेशन मार्फत गरजू कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


प्रतिनिधी

मुंबई -  
श्री फाउंडेशन या संस्थेमार्फत भांडुप पश्चिम  येथील ६५०  हून अधिक  गरजू  कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अधिक दुर्बल महिला आणि मोलमजुरी करणाऱ्या गरिब  
कुटुंबांना किराणा कीटसह, मोफत धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच सामान्य जनतेच्या अडचणी वाढत आहेत. सर्वात मोठी अडचण दररोज पोट भरण्याची असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी भांडुप मधील एक अग्रगण्य संस्था श्री फाउंडेशन च्या माध्यमातून  दुर्बल महिला आणि मोलमजुरी करणाऱ्या गरिब लोकांसाठी पुढे सरसावली आहे.
श्री फाउंडेशनच्या अध्यक्षा, व समाजसेविका दिक्षा कदम त्याचप्रमाणे तृप्ती गावडे,मनोज सुवरे,महेश माने,दिप्ती कदम,रूपेश चव्हाण व इतर सभासद यावेळी उपस्थित होते.
यावेळी वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये किराणा कीट, तूरडाळ, कांदे, बटाटे, तेल, मसूर, हरभरे, रवा, मीठ, कपडे साबण, अंगाचा साबण, साखर, चहा पावडर, तिखट, हळद, इत्यादी वस्तू देण्यात आल्या.

आर्थिक नियोजनानुसार ६५० गरजू कुटुंबियांना धान्य वाटप करण्यात आले. श्री फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या १५ दिवसांत भांडुप मधील झोपडपट्टीचा सर्व्हे करून मोलमजुरी करणाऱ्या ८५० कुटुंबांची यादी तयार केली. या सर्वांना आवश्यक किराणा मिळेल असे कीट तयार करून ते वाटप करण्याचे ठरविले. त्यानुसार आर्थिक नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात  ६५० कुटुंबाना संस्थेने धान्याचे वाटप केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...