घाटकोपर(शांताराम गुडेकर/निलेश मोरे )
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सामान्य जन जीवन देखील विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. कामे बंद असल्याने हाताला पैसा नाही.शासनाने रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्य वाटप सुरू केले असले तरी मुंबईच्या दादा प्रतिष्ठान या युवकांच्या ग्रुपने सामान्य तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशांना संचारबंदीत धान्याचे किट वाटप केले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू पवार व रिधी अलविटा फाऊंडेशन यांच्यावतीने घाटकोपर येथील एम.जी.रोड येथे नागरिकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा