आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३० मे, २०२०

लाईट बिल माफ व्हावे


करोनाच्या अस्मानी संकटात लॉकडाऊन मुळे जनता घरी बसली आहे. उत्पातनाचा मार्ग बंद झाला आहे. परंतु परप्रांतीय नोकरदार वर्ग, नोकरी नाही म्हणून आपल्या कुटूंबीय सह आपल्या मूळ गावी जातांना, त्यांना मोफत जेवण देण्यात येत असून, त्यांना श्रमिक एक्सप्रेस तर्फे मोफत प्रवास मिळत आहे. अशा परिस्थितीत मुंबई महाराष्ट्रातील सर्व सामान्य मध्यम वर्गीय भूमी पुत्राला कोणत्याही प्रकारची आर्थिक माफी, सवलत मिळू शकत नाही. त्यात लोकडाऊन मुळे उन्हाळ्यात घरात बसून पंखे, AC, वेळ घालवण्यासाठी बातम्या ,टीव्ही चालू आहेत. अशा परिस्थितीत लाईट बिल मध्ये वाढ होत आहे. त्यातही मागील २ महिन्याचे घरपोच इलेक्ट्रिक बिल मिळू शकलेले नाही. आणि पुढे कधी मिळेल सांगता येत नाही. थकबाकी वाढू शकणार आहे. ते एकदम देण्यास सर्व सामान्य शासकीय नियम पाळून घरी बसलेल्या मध्यम वर्गीय नोकरदारांना एकदम बिल भरणे महाग होणार आहे. तरी शासनाने मार्च ते ऑगस्ट पर्यंत ६ महिन्याचे घरगुती इलेक्ट्रिक बिल पॅकेज च्या मार्फत माफ करावयास हवे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळू शकेल.

-विजय ना कदम
लोअर परळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...