६८ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाउन नंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र निर्बंध शिथिल होण्याची चिन्हे दिसत आहेत.हे होणे जरी क्रमप्राप्त असले तरी,त्यात पहिल्या टप्प्यात ८ जून पासून धार्मिक स्थळे आणि शॉपिंग मॉल्स, हॉटल्स यांना परवानगी देने अनाकलनीय असेच आहे.एक वेळीस हॉटेल्स यांना परवानगी देने समजू शकतो कारण, अन्न हे मूलभूत गरज आहे पण, शॉपिंग मॉल्स आणि धार्मिक स्थळे जिथे गर्दी होण्याची कायम शक्यता आहे.अश्या स्थळांना केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी कुठल्या निकषांचा आधारे दिली? शॉपिंग मॉल्स जिथे कायम गर्दी होण्याची शक्यता असते आणि ज्यांचा संबध मूलभूत गरजांसाठी होऊ शकत नाही.केवळ चैनीच्या आणि अनावश्यक वस्तू मिळण्याचे ठिकाण हे कशाच्या आधारे पहिल्याच टप्प्यात उघडण्यास कसे काय योग्य आहे?या ६८ दिवसांत आतापर्यंत सर्व धर्मियांचे झालेले सण सर्व धर्मियांनी गुण्यागोविंदाने घरातच साजरे करून सर्वांनी आपली धार्मिक प्रगल्भता दाखवून दिलेली असतांना. जिथे गर्दी होते असे ठिकाण असलेल्या धार्मिक स्थळांना पहिल्याच टप्प्यात परवानगी देणे अनाकलनीय असेच म्हणावे लागेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान
मुंबई (गणेश हिरवे) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा