कोरोना विषाणूचा वाढता प्रसार व त्यामुळे सुरु असणारे देशव्यापी लाॅकडाउन लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच आहे. कारण लाॅकडाउन असल्यामुळे रोजगारही उपलब्ध नाही, त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीबरोबरच इतर सदस्यांचे अत्यंत हाल होत आहेत. परंतु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दुमत दर्शविले आहे. मुंबईसह अन्य शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या गावाकडे गेले तर काय खाणार? अशी चिंता गडकरीना भेडसावत आहे. गडकरी यांची चिंता अयोग्य आहे असे मला वाटते. कारण स्वतःच्या राज्यात जाऊन थोडीफार मोलमजुरी करून हे नागरिक उपजीविका करु शकतात. महाराष्ट्र राज्य सरकारने आजपर्यंत काही कमी पडू दिले नाही. आता त्यांना त्यांच्या राज्यात जाऊ द्या. त्यांच्या माय-बाप सरकारलादेखील त्यांच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. जेणेकरून, तेवढेच पुण्य त्यांच्या सरकारच्या पदरी पडेल.
- सुधीर कनगुटकर
१/९, संतोष भगत चाळ,
बी आर नगर,
दिवा (पूर्व), ४०० ६१२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा