आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

टाळेबंदीत अत्यावश्यक उद्योग सुरू व्हावेत


संपूर्ण जगाला वेढीस धरणारा कोरोना अजुन माघारी जाण्याचा विचार करत नाही. स्पर्श म्हणजे कोरोना. ही भीती काही काळ टिकून राहणार आहे. जीवनावश्यक वस्तू जोपर्यंत मिळताहेत तोपर्यंत टाळेबंदीचा परिणाम जाणवत नाही. परंतु टाळेबंदीत वस्तू मिळेनाशा झाल्यावर खर वास्तव कळेल. ताळेबंदी नंतर दुकाने उघडतील आणि मुबलक वस्तू मिळतील हा भ्रम आहे. यासाठी अंशत: ताळेबंदी उठविणे अर्थ व्यवस्थेला धरून आहे. लहान लहान उद्योग सुरू करावेत. उत्पादन बाजारात येईल. कामगार वर्ग तातडीने कामावर रुजू होईल अशी आशा अजिबात नाही. म्हणून सध्याच्या टाळेबंदी काळात अत्यावश्यक उत्पादन वाढीस सरकारने लक्ष दिले पाहिजे. पवसापूर्वी खोळंबलेली कामे सुरू झाली पाहिजेत. ताळेबंदी नंतर विविध सामग्री आदी सामानाची मागणी वाढणार आहे. परंतु त्यांच्या उत्पादनाला वेळीच संधी न दिल्यास पुरवठा शक्य नाही. आपला परिसर, आपले राज्य कोरोना मुक्ता झाला म्हणजे लढाई संपली असे नाही. जगण्याची लढाई सुरू होणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने वेळीच अभ्यासपूर्वक भविष्याकडे पाहण्याची गरज आहे.


-श्री. कृष्णा काजरोळकर
२४४/९५७०, कन्नमवार नगर १,
विक्रोळी पूर्व, मुंबई ४०००८३.
Mob. ९९६९२६०२६७.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...