आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

विद्यापीठ परीक्षा रद्द कराव्यात


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द केला तसेच पहिली ते नववी व आकारावीचीही वार्षिक परीक्षा रद्द केली. सरकारच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने ज्या तत्परतेने घेतला त्या तत्परतेने महाविद्यालयीन परिक्षांबाबत राज्य सरकार घेत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षांसाठी ऑनलाइन परीक्षा, एक तासाची ऑफ लाईन परीक्षा, स्काईप द्वारे परीक्षा आणि प्रकल्प सादरीकरण अशा विविध पर्यायांचा विचार करीत आहे पण कोणताही ठोस निर्णय होत नाही. राज्य सरकारनेही याबाबत एक समिती स्थापन केली आहे तरीही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवून त्यांची धाकधूक वाढवण्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या म्हणजेच विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. ३ मे नंतर लॉक डाऊन संपले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईलच याची शाश्वती नाही. पुण्यामुंबई सारख्या मोठया शहरांत तर कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. पुण्यामुंबई सारख्या महानगरात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे त्यामुळे ३ मे नंतरही विद्यापीठाच्या ऑफलाईन लेखी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे होय. विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालण्यापेक्षा सद्य स्थितीत या परीक्षा रद्द करणेच योग्य आहे. पुणे व मुंबईत उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांमध्ये बाहेर गावांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. लॉक डाऊन असल्यामुळे पुण्यामुंबई बाहेरील  विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. लॉक डाऊन संपल्यानंतर लगेच ते येतील याचीही शक्यता कमी आहे. जरी ते आले तरी ३ मी नंतर लगेच परीक्षा घेणे शक्य नाही. ऑनलाइन किंवा स्काईपद्वारे परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तरी असा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे कठीण आहे. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरनेटची उभारणी करणे शक्य होईल का? ही सुविधा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार का? दुर्गम भागात आजही इंटरनेटची पुरेशी सुविधा नाही काही भागात  इंटरनेटची  सुविधा आहे पण इंटरनेटचा स्पीड कमी आहे. त्यामुळे ऑनलाइन किंवा स्काईपद्वारे परीक्षा घेणे कितपत संयुक्तिक आहे? एका तासाची ऑफलाईन परीक्षा घ्यायची झाल्यास सोशल डिस्टन्स कसे पाळणार? जर संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असेल तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत कसे आणणार? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ काय नियोजन करणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.केवळ विद्यार्थ्यांचे पेपर झाले म्हणजेच परीक्षेची पूर्ण प्रक्रिया झाली असे नाही. परीक्षा झाली तरी प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल घोषित करणे, पुढील वर्षासाठी प्रवेश याही महत्वाच्या बाबी आहेत.यासर्व बाबींचा विचार केला तर राज्य सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करणेच योग्य आहे. विनाकारण विद्यार्थ्यांच्या जीव टांगणीला लावून त्यांच्या भावनांशी खेळणे योग्य नाही. कोरोनाचे गडद होणारे संकट पाहता विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता राज्य सरकारने या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. 

--श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...