आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

आंबेडकरी चळवळीतील कणखर नेतृत्व "शांताराम मोहिते" कालवश

मुंबई (प्रवीण रा. रसाळ)- आंबेडकरी चळवळीतील कणखर नेतृत्व, कामगार नेते, न्यायप्रिय व चिपळूण हितवर्धक समितीचे (सत्तावीस गाव ग्रुप, शिरवली) माजी चिटणीस उमरोली गावचे सुपुत्र शांताराम आनंदा मोहिते यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या अंतयात्रेला बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आरपीआय तसेच समाजातील विविध स्तरावरील नेतेमंडळी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता तसेच हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उसळला होता, सर्वांनी अत्यंत जड अंतकरणाने आपल्या लाडक्या नेत्यास शेवटचा निरोप दिला.

शांताराम मोहिते हे मनमिळाऊ, हसतमुख व अडल्या-नडलेल्याना सढळ हस्ते मदत करण्यास तत्पर असत, कामगारांच्या अनेक किचकट समस्या योग्यरीत्या हाताळून सत्याच्या बाजूने न्याय करणारे अशी त्यांची ख्याती होती, प्रसंगी स्वतःच्या नोकरीचीही पर्वा न करता कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यास शेवटचा निरोप देताना अनेकांचे अश्रू अनावर झाले.

दिवंगत शांताराम मोहिते यांच्यामागे पत्नी, दोन मुले व दोन मुली, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे, शांताराम मोहिते यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांची शोकसभा त्यांच्या जन्मगावी मु. गाव उमरोली, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी उमरोली शाखेच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...