आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

घारापुरी पर्यटन स्थळाला स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करण्याची सरपंच बळीराम ठाकूर यांची मागणी.

उरण -उरण तालुक्यातील घारापुरी (एलीफंटा )हे जागतिक कीर्तीचा दर्जा लाभलेले पर्यटन क्षेत्र आहे. समुद्राच्या चारही बाजूने वेढलेले हे बेट आहे. त्या अनुषंगाने समुद्राची सफर तसेच कोरोव लेणी पाहण्यासाठी बेटावर देश विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि घारापुरी (एलीफंटा)येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह हा 100% पर्यटनावर अवलंबून असतो. पर्यटक हेच एकमेव रोजगाराचे व उपजीविकेचे साधन आहे. तसेच पर्यटका व्यतिरिक्त बेटावरील ग्रामस्थांना अन्य कोणतेही रोजगाराचे साधन नाही.त्यामुळे शासनाने घारापुरी बेटाला स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करून पर्यटन सुरु ठेवून घारापुरीतील स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

   देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यामुळे पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु एन हंगामात बंदी लागू केल्याने घारापुरी या पर्यटन क्षेत्रावर आधारित अर्थचक्र पूर्णतः ठप्प झाले आहेत. तसेच सरसकट पर्यटन क्षेत्र बंद केल्याने बेटावरील लोकल गार्ड, हस्तकला, वस्तू विक्रेते, लघु उद्योजक, स्टॉल धारक, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटकावर आधारित बेटावरील सर्व भागधारकांवर रोजगाराविना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरसकट बंदी ऐवजी निर्बंधासह व्यवसाय करण्याची मुभा दिल्यास येथील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होईल.

    या आधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मार्च 2020 रोजी पासून पुकारलेल्या पर्यटकबंदी मुळे घारापुरी (एलीफंटा )येथील ग्रामस्थ एक ते दिड वर्षापासून बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे आताच कुठे पर्यटन क्षेत्र सुरु होऊन बेटावर पर्यटकांची रेलचेल सुरु असतानाच पुन्हा पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने ग्रामस्थांवर बेरोजगाराची आपत्ती कोसळली आहे. त्यामुळे घारापुरी (एलीफंटा )पर्यटन क्षेत्राला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषित करून सदरचे पर्यटन क्षेत्र सुरु ठेवल्यास येथील ग्रामस्थांना दिलासा मिळेल अशी मागणी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर आदींना पत्रव्यवहार करून केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिपत्याखाली एखाद्या पर्यटन स्थळास स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करू शकतील असे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने घारापुरी (एलीफंटा )या उरण तालुक्यातील जगप्रसिद्ध बेटाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता बेटावर अन्य कुठेही, कोणतेही रोजगाराचे साधन नसल्याने सदरचे पर्यटन क्षेत्र सुरु ठेवण्याकरिता रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केल्यास घारापुरी ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...