आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

विद्यार्थी भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त बालविवाह विरोधी 'उल्काकल्लोळ' कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : विद्यार्थी भारतीचा १५ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी कस्तुरबा हॉल ,माटुंगा येथे सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०७:०० या वेळेत संपन्न होणार आहे.

  या निमित्ताने "बालविवाह एक क्रूर प्रथा" या एकाच विषयावर कोणतीही प्रवेश फी न आकारता चित्रकला ,निबंध, लघुचित्रपट , फेसपेंटिंग, रिल्स, फोटोग्राफी, वक्तृत, कविता,एकपात्री,व्यंगचित्र अश्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने होणार असून डान्स आणि पथनाट्य कार्यक्रमाच्या दिवशी ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत.  किमान ५०० शब्दात निबंध लिहून निबंध स्पर्धेसाठी शुद्धलेखनाचे नियम पाळले जाणार नाहीत आपल्या प्रत्येक स्पर्धेचे असेच काहीसे खास आणि वेगळे नियम असणार आहेत. असेही या निमित्ताने राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांनी सांगितले आहे. 

   तरी इच्छुकांनी आपले साहित्य २४ नोव्हेंबर पर्यंत Mail id : vidyarthibharti@gmail.com वर पाठवावी अशी विनंती स्पर्धा प्रमुख साक्षी भोईर यांनी केली आहे.तरी या स्पर्धेत भाग घेऊन बालविवाह विरोधी लढा तीव्र करण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरि धुरी यांनी केले आहे 

    या कार्यक्रमात सामाजी क कार्यकर्ते मा.लता प्र. म. पत्रकार मा.मुकेश माचकर  , राष्ट्रवादीच्या नेत्या मा. विद्या चव्हाण ताई. राष्ट्रवादी पक्षाचे नेते मा. जितेंद्र आव्हाड साहेब,प्रसिद्ध अभिनेत्री  हेमांगी कवी ,मा.अलका गाडगीळ ताई.,प्रसिद्ध लेखिका  वंदना खरे ,भारत बचाव आंदोलन अध्यक्ष फिरोज मिठीबोरवाला सर, प्रसिद्ध कवी महेश केळुसकर , कवी मा.अरुण म्हात्रे , कवी प्रशांत मोरे  इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रम प्रमुख शुभम राऊत यांनी दिली.तरी बालविवाह विरोधी चळवळीला आपण कार्यक्रमास उपस्थित राहून साथ द्यावी असे आवाहन अर्जुन बनसोडे यांनी विद्यार्थी भारतीच्या पत्रकाद्वारे केले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क- साक्षी भोईर :- 8830640563 ,शुभम राऊत : - 9029616190,आरती गुप्ता :- 8104571787,अक्षय घाणेकर:-7066935624, जागृती भाट :- 9545577723

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...