रायगड : परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. ने भारतातील दिव्यांग जनबांधवांसाठी केलेले अप्रतिम महान उल्लेखनीय सामाजिक कार्य कि जे सामाजिक न्याय व सक्षमीकरण भारत सरकार व नॅशनल ट्रस्ट अंतर्गत चालवलेली ‘निरामय आरोग्य विमा योजना’ ही ट्रस्ट ने केलेल्या खडतर प्रयत्नांनी यशस्वी झाली आहे.
सामाजिक महान अप्रतिम कार्याचे मूल्यांकन करणे दिव्यांग जन बांधव आणि त्यांचे परिवार यांना शक्य नाही किंवा त्यासाठी शब्दच नाहीत. निरामय आरोग्य विमा योजनेअंतर्गत एक ०१.आत्ममग्न ०२.मेंदूचा पक्षघात ०३. मतिमंद ०४. बहुविकलांग या चार प्रकारच्या दिव्यांग जन बांधवांना नॅशनल ट्रस्ट अंतर्गत या सुवर्ण योजनेचा फायदा मिळत आहे. परंतु या सर्व बाबींचा योग्य असा विचार विनिमय करावा.
सर्व दिव्यांगजन बांधवांचे एकूण एकवीस प्रकार आहेत. त्यामध्ये ‘शीर्ष 10’ प्रमुख दिव्यांगजन बांधवांचे वर्गीकरण केलेले आहे. त्या वर्गवारी मध्ये बसणारे दिव्यांग जनबांधव यांना आपण राबवित असलेल्या परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. यांच्या माध्यमातून निरामय आरोग्य विमा योजनेअंतर्गत समाविष्ट करून घेण्यास भारत सरकार व सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय तसेच नॅशनल ट्रस्ट यांच्याकडे आपल्या दिव्यांगजन बांधवांसाठी पाठपुरावा करून सुवर्ण मोलाचा फायदा कसा मिळेल या अनुषंगाने बहुमोलाचे सामाजिक सहकार्य केले तर नक्कीच परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. यांना यश प्राप्त होईल
वरील सर्व बाबींचा योग्य, सकारात्मक दृष्ट्या असा विचार विनिमय करून कायदा व नियमांच्या रचनेत न्याय्य मागणी करणे योग्य ठरेल. वास्तविक पाहता आपल्या दिव्यांग जन बांधवांच्या खऱ्या मागणीला विनाविलंब मान्यता मिळेल त्याच प्रमाणे भारत सरकार हे जनतेसाठीच आहे याची जाणीव आपल्या परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. यांनी किंवा यांच्यावतीने भारत सरकार व नॅशनल ट्रस्ट यांना करावी यासंबंधी योग्य तो सकारात्मक विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा. हा निर्णय घेतल्यास भारत सरकारला काही मोठा आर्थिक फरक पडेल असे दिसून येत नाही,परंतु आपले जे काही दिव्यांगजन बांधव आहेत व त्यांचे परिवार आहेत की ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे किंवा असणाऱ्या दिव्यांगजन बांधवांना व परिवारासाठी हा एक उपयुक्त महत्त्वाकांक्षी सुवर्ण निर्णय असू शकतो.
या अप्रतिम उल्लेखनीय महान कार्याची सुवर्ण सुरुवात महाराष्ट्रातून आपल्याच परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. कडून करण्यात यावी . आपली हि कार्यपद्धती बघून इतर राज्य सुद्धा त्याचा शुभारंभ करतीलच यात मात्र शंकाच नाही . तेव्हा वरील सर्व बाबींचा योग्य तो विचारविनिमय करून दिव्यांगजन बांधवांसाठी एक खास बाब म्हणून शीर्ष 10 प्रमुख दिव्यांगजन बांधव यांच्या सवलतीचा विचार करण्यात यावा अशी विनंती संजय पंढरीनाथ काळे व मित्रपरिवार तसेच सर्व दिव्यांगजन बांधव आणि परिवार त्यांच्यामार्फत परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. चे अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य यांना केली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा