आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,मुंबई- बहिणाबाई साहित्य संस्था डोम्बिवली साहित्य जागर मंच मुंबई आयोजित दिनांक २९ ऑगस्ट रोजी निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी जयंती कार्यक्रम ऑनलाईन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यांनतर माझी माय सरसोती हे काव्य धनश्री महाजन हिने सादर केले.साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. नि. रा. पाटील व डॉ. चंद्रशेखर भारती यांना साहित्य गौरव सन्मान प्रदान करून गौरवण्यात आले.डॉ. नि. रा. पाटील व डॉ.चंद्रशेखर भारती यांनी आपल्या मनोगतातून बहिणाईचे साहित्य हे लिहिणाऱ्याला नेहमी नवनिर्मितीची प्रेरणा देणारे आहे असे मत मांडले. यानंतर विविध कवी, लेखक, रसिक यांनी काव्य, विचार सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन तसेच संपूर्ण तयारी प्रदीप कासुर्डे सर यांनी केली होती.
यावेळी अनमोल खजिना पुस्तक प्रकाशनाबद्दल लिलाधर महाजन यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात, कवी राजेश साबळे,कवी अजय सोंडूलकर,कवयित्री लता पाटील, भाग्यश्री महाजन, आरती मूळे, कादंबरीकार पंढरीनाथ कोळी,महेश साळवे तसेच इतर मान्यवर रसिक उपस्थित हॊते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा