२००५ मध्ये मानाजी राजूजी चाळीत आम्ही S.S.C. व्याख्यानमाला करायचे ठरवले. तशी कामाठी चाळ म्हणजे गुंडांचा अड्डा म्हणून ओळखली जायची. त्या व्याख्यानमालेच्या उदघाटनाला जयंताला बोलवायचे असे ठरले. ती जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. मी जयंतला फोन लावून सांगितले . जयंतला त्याचे आश्चर्य वाटले ! " काका काय सांगता ? आपल्या चाळीत S.S.C. व्याख्यानमाला ?" त्याने उदघाटनाला नाही जमणार, पण मध्येच येऊन जाईन म्हणाला. अखेर आम्ही जयंतला समारोपाला बोलावले. आणि तो वेळ काढून आला.जयंत महाराष्ट्र टाइम्स मध्ये वरिष्ठ उपसंपादक होता. माझ्या ब-याच बातम्या तो मटामधे छापत होता. एक पत्रकार, साहित्यिक , नाटककार आमच्या चाळीत राहतो याचा आम्हाला अभिमान वाटत होता. जयंत सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांचा भाचा होता. तो अत्यंत बुद्धीमान तरीही साधा व निगर्वी होता. वसा दिवाळी अंकाचे संपादन जयंत पवार करीत होता. असा एक सव्यासाची व साक्षेपी मित्र आम्ही गमावला आहे. जयंत पवार यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली !
- अनंत आंगचेकर, भाईंदर (ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक-पत्रकार )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा