आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २७ जून, २०२१

कोकण युवा क्रांती संघटना ; ध्यास समृद्ध कोकणाचा

 

आपण आता पर्यंत बघत आलो आहे,ज्यापद्धतीने कोकणचा विकास पाहिजे होता तसा नाही झालाय त्याला आपणसुद्धा कारणीभूत आहोत कारण आपण कोणत्या गोष्टींचा विरोध अथवा मागणी केलीच नाही पण यापुढे अस होणार नाही.या हेतूने कोकण युवा क्रांती संघटनेने समृद्ध कोकणाचा ध्यास मनी धरला आहे.आता कोकणात समाजिक आणि औद्यागिक क्रांती घडवण्याचा निश्चय करून लवकरच मैदानात उतरत आहे पण ते शक्य कधी होणार जेव्हा आपण सर्व युवा पिढी एकवटेल तेव्हा पक्ष कोणतेही असोत एक कोकणी म्हणून संघटीत व्हा असे आवाहन कोकण युवा क्रांती संघटना करत आहे. 

तुम्ही अनुभवलात की नाही हे मला माहित नाही पण वास्तविक उदाहरण आहे, एक परप्रांतीय काहीही जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना आपल्याच प्रांतीयाकडूनच करतो त्यामागच सर्वात मोठ कारण म्हणजे आपल्या माणसाला ४ पैशाचा फायदा होतो आणि असेच सर्व परप्रांतीय पैसा कमवतात वेळ आली तर एकमेकाना मदत करतात.आपण पण तेच करायचे आपल्याच माणसाकडून खरेदी करा म्हणजे आपण आपल्या कोकणातील पैसा कोकणातच ठेवू जेणेकरून कोकणाच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडेल.तसेच मोठा प्रश्न जमिनीचा आहे रोजच्या शेकडो जाहिराती बघतोय आम्ही जमिनी विकायच्या आहेत आणि जमीनी विकून करणार काय तर मुंबईत स्वतःच घर घ्यायचं आहे.मित्रांनो आम्ही ज्या चूका केल्यात त्या तुम्ही नका करू आम्हाला मार्गदर्शन करणार कोणी नव्हत पण आम्हाला आमच्या चुका कळल्या आहेत आम्ही गावाकडे परत आहोत बांधवानो गाव नका सोडू गावातच आपण नवे प्रकल्प,उद्योग चालू करू म्हणजेच फायदा झाला तरी सर्वांचा आहे,आणि जर नुकसान झाल तरी जास्त नाही होणार आपण अस केल तरच लवकर क्रांती घडवू.ही माझी निश्चितच सफल होणारी विचारधारा आहे.आपण जमिनी विकतो आणि शहरात येतो पण परप्रांतीय या गोष्टीचा फायदा घेतात ते आपण विकायला काढलेल्या जमिनी खरेदी करतात आणि उद्योगधंदे चालू करतात आणि मग आपण त्यांच्याकडून खरेदी करतो हे कीती दिवस चालणार आपण जर ठोस पाऊले उचलली नाहीत तर आपल्या येणाऱ्या पिढीला कोकण फक्त नकाशात दखवाव आणि गोष्टीत सांगाव लागेल.जमिनी विकू नका त्या भाड्याने द्या किंवा त्यांच्या सोबत भागीदारीत व्यवसाय करा पण अपल्या कोकणी माणसासोबतच.कोकणातील जमिनीवर कोकणी माणसाशिवाय कोणाचाच अधिकार नाही.हे आपण दाखवून देवू.माझ्या या संकल्पित विचारांना अगदी सगळ्यांची अनमोल साथ आणि प्रत्येक्षपणे सहकार्य हवंय,येणाऱ्या काळात एक वेगळं परिवर्तन करण्याचा माझा मनी ध्यास आहे.

"जय महाराष्ट्र !! जय कोकण"

आपलाच कोकणी बांधव,

                                                


अभिजित कोटकर, 

(संस्थापक/अध्यक्ष -कोकण युवा क्रांती संघटना )

संपर्क - ८८९८४४८०५३/८१६९६०२२२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...