आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३० मे, २०२१

भारती कदम यांचा पहिला स्मृतिदिन संपन्न

मुंबई  : बौध्दजन हितवर्धक समिती, शाखा गुडे, या शाखेचे सन्मानिय सभासद राजेंद्र कदम यांच्या सुविद्य पत्नी भारती कदम गाव गुडे, ता. चिपळूण यांच गेल्या वर्षी आकस्मिक दुःखद निधन झाल्याने त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचे आयोजन "जय भवानी गृहनिर्माण सोसायटी" या कमिटीचे अध्यक्ष विजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत एलपिस्टन येथील समाज मंदिर हॉल मध्ये संपन्न झाला.
   सदर ठिकाणी बौद्धाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजींनी धार्मिक विधी यथायोग्य पार पाडून कार्यक्रमाला सुरवात केली, भारती कदम यांना आदरांजली अर्पण करण्यास मुंढर, मढाळ, मळन, गुडे, धामण इत्यादी गावचे गमरे, कदम, तांबे, जाधव इत्यादी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते, मान्यवरांनी भारती कदम या मनमिळाऊ, उत्साही, प्रेमळ आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होत्या अशी शब्दसमुने अर्पण करीत आपले मत व्यक्त करून त्याना श्रद्धांजली वाहिली.
  जय भवानी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष विजय मोहिते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...